शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kerala Floods : केरळी आपद्ग्रस्तांसाठी रत्नागिरीतून पाच टन धान्य गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 17:34 IST

रत्नागिरी येथील मल्याळी संघटनेने रत्नागिरीकरांना आवाहन करताच शहरातील व्यापाऱ्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करून तब्बल पाच टन धान्य, ५०० किलो आटा आणि इतर विविध वस्तू अवघ्या दोन दिवसांत जमवून ही सर्व मदत केरळला रवानाही केली. केरळमधील आलपी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या सर्व वस्तू वितरणाकरिता सुपूर्द करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे मल्याळी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसादरत्नागिरीकरांच्या दातृत्त्वाचे केरळवासियांकडून कौतुक

रत्नागिरी : येथील मल्याळी संघटनेने रत्नागिरीकरांना आवाहन करताच शहरातील व्यापाऱ्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करून तब्बल पाच टन धान्य, ५०० किलो आटा आणि इतर विविध वस्तू अवघ्या दोन दिवसांत जमवून ही सर्व मदत केरळला रवानाही केली. केरळमधील आलपी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या सर्व वस्तू वितरणाकरिता सुपूर्द करण्यात येणार आहेत.केरळमधील महापुराने या राज्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत केले आहे. अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या कष्टप्रद अवस्थेत दिवस कंठावे लागत आहेत. पुरात सर्व काही वाहून गेल्याने या लोकांच्या खाण्या-पिण्याची, कपडालत्ता तसेच राहण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या राज्याला सर्वांच्याच तातडीच्या मदतीची गरज आहे.याच भावनेतून रत्नागिरीत उद्योग, व्यवसाय तसेच नोकरीनिमित्त वास्तव्याला असलेल्या केरळी बांधवांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी रत्नागिरीकरांना मदतीचे आवाहन करताच रत्नागिरीकरांनी आपले दातृत्व दाखवत आर्थिक मदतीचा हात पुढे केला. विशेषत: रत्नागिरीतील व्यापारी मंडळींनीही सढळ हाताने धान्य तसेच इतर वस्तुंची मदत केली आहे. अवघ्या दोन चार दिवसात ही मदत जमा झाली आहे.येथील केरळी बांधवांनी मल्याळी संघटना स्थापन केली आहे. यात मोहन नायर, सुरेश नायर, अजित पुन्नकलेकर, बाबू नायर, रॉय एलियात, प्रवीण यांचा समावेश आहे.

ही संघटना तसेच रत्नागिरीतील नागरिक आणि येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन केलेल्या या मदतीमुळे साडेतीन टन तांदूळ, एक टन गहू, ५०० किलो आटा (पीठ) याचबरोबर विविध प्रकारचे बेकरी पदार्थ, सॅनिटरी नॅपकीन, कपडे, विविध प्रकारची औषधे, डाळ, तेल, तसेच घरगुती साहित्य मोठ्या प्रमाणावर जमा झाले आहे.पाच टन धान्य आणि इतर वस्तुंनी भरलेला स्वतंत्र ट्रक गुरूवारी सायंकाळी केरळकडे रवाना झाला आहे. तिथे पोहोचल्यानंतर आलपी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या वस्तु सुपूर्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर या वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे. मल्याळी सेवा संघाने आवाहन करताच रत्नागिरीकर केरळवासियांच्या मदतीला धावून गेले. त्यामुळेच एवढी मदत गोळा झाली, याबद्दल या संघटनेने रत्नागिरीकरांना धन्यवाद दिले आहेत.एकात्मतेचे दर्शन...प्रत्येकालाच आपल्या भाषेचा, गावाचा, प्रांताचा, राज्याचा अभिमान असतो. यातून अनेकदा वादही निर्माण होतात. मात्र, जेव्हा आपत्ती येते, तेव्हा आपण मदतीला धावून जायला हवे, ही मानवतावादाची भावना प्रत्येकात निर्माण होते. केरळ राज्यावर आलेल्या आलेल्या या नैसर्गिक आपत्तीवेळी इतर राज्यांबरोबरच महाराष्ट्रानेही मदतीसाठी धाव घेतली आहे. रत्नागिरीकरांनीही मनापासून सर्व प्रकारच्या मदतीचा हात पुढे करत देशाच्या एकात्मतेचे दर्शन घडविले. 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRatnagiriरत्नागिरी