शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

Kerala Floods : केरळी आपद्ग्रस्तांसाठी रत्नागिरीतून पाच टन धान्य गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 17:34 IST

रत्नागिरी येथील मल्याळी संघटनेने रत्नागिरीकरांना आवाहन करताच शहरातील व्यापाऱ्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करून तब्बल पाच टन धान्य, ५०० किलो आटा आणि इतर विविध वस्तू अवघ्या दोन दिवसांत जमवून ही सर्व मदत केरळला रवानाही केली. केरळमधील आलपी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या सर्व वस्तू वितरणाकरिता सुपूर्द करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे मल्याळी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसादरत्नागिरीकरांच्या दातृत्त्वाचे केरळवासियांकडून कौतुक

रत्नागिरी : येथील मल्याळी संघटनेने रत्नागिरीकरांना आवाहन करताच शहरातील व्यापाऱ्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करून तब्बल पाच टन धान्य, ५०० किलो आटा आणि इतर विविध वस्तू अवघ्या दोन दिवसांत जमवून ही सर्व मदत केरळला रवानाही केली. केरळमधील आलपी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या सर्व वस्तू वितरणाकरिता सुपूर्द करण्यात येणार आहेत.केरळमधील महापुराने या राज्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत केले आहे. अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या कष्टप्रद अवस्थेत दिवस कंठावे लागत आहेत. पुरात सर्व काही वाहून गेल्याने या लोकांच्या खाण्या-पिण्याची, कपडालत्ता तसेच राहण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या राज्याला सर्वांच्याच तातडीच्या मदतीची गरज आहे.याच भावनेतून रत्नागिरीत उद्योग, व्यवसाय तसेच नोकरीनिमित्त वास्तव्याला असलेल्या केरळी बांधवांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी रत्नागिरीकरांना मदतीचे आवाहन करताच रत्नागिरीकरांनी आपले दातृत्व दाखवत आर्थिक मदतीचा हात पुढे केला. विशेषत: रत्नागिरीतील व्यापारी मंडळींनीही सढळ हाताने धान्य तसेच इतर वस्तुंची मदत केली आहे. अवघ्या दोन चार दिवसात ही मदत जमा झाली आहे.येथील केरळी बांधवांनी मल्याळी संघटना स्थापन केली आहे. यात मोहन नायर, सुरेश नायर, अजित पुन्नकलेकर, बाबू नायर, रॉय एलियात, प्रवीण यांचा समावेश आहे.

ही संघटना तसेच रत्नागिरीतील नागरिक आणि येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन केलेल्या या मदतीमुळे साडेतीन टन तांदूळ, एक टन गहू, ५०० किलो आटा (पीठ) याचबरोबर विविध प्रकारचे बेकरी पदार्थ, सॅनिटरी नॅपकीन, कपडे, विविध प्रकारची औषधे, डाळ, तेल, तसेच घरगुती साहित्य मोठ्या प्रमाणावर जमा झाले आहे.पाच टन धान्य आणि इतर वस्तुंनी भरलेला स्वतंत्र ट्रक गुरूवारी सायंकाळी केरळकडे रवाना झाला आहे. तिथे पोहोचल्यानंतर आलपी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या वस्तु सुपूर्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर या वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे. मल्याळी सेवा संघाने आवाहन करताच रत्नागिरीकर केरळवासियांच्या मदतीला धावून गेले. त्यामुळेच एवढी मदत गोळा झाली, याबद्दल या संघटनेने रत्नागिरीकरांना धन्यवाद दिले आहेत.एकात्मतेचे दर्शन...प्रत्येकालाच आपल्या भाषेचा, गावाचा, प्रांताचा, राज्याचा अभिमान असतो. यातून अनेकदा वादही निर्माण होतात. मात्र, जेव्हा आपत्ती येते, तेव्हा आपण मदतीला धावून जायला हवे, ही मानवतावादाची भावना प्रत्येकात निर्माण होते. केरळ राज्यावर आलेल्या आलेल्या या नैसर्गिक आपत्तीवेळी इतर राज्यांबरोबरच महाराष्ट्रानेही मदतीसाठी धाव घेतली आहे. रत्नागिरीकरांनीही मनापासून सर्व प्रकारच्या मदतीचा हात पुढे करत देशाच्या एकात्मतेचे दर्शन घडविले. 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRatnagiriरत्नागिरी