शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

रत्नागिरीतील कापडगावाने ६६ वर्षे जतन केल्या आहेत बाबासाहेबांच्या अस्थींचे 

By शोभना कांबळे | Published: December 06, 2022 12:27 PM

कापडगाववासीय या अस्थिकलशाचे दर्शन दररोज घेत आहेत.

शोभना कांबळेरत्नागिरी : विश्वभूषण, क्रांतिसूर्य, परिवर्तनाचे महामेरू, घटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य अशा असंख्य उपाधींनी गौरविले गेलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला ६६ वर्षे पूर्ण होत आहेत. कापडगाव (ता. जि. रत्नागिरी) येथील समता सैनिक दलाचे सदस्य असलेले या गावातील राजाराम माणका कांबळे यांनी आणलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे जतन या गावातील जनता भक्तिभावाने करीत आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मंजूर केलेल्या निधीतून या गावात भव्य बुद्धविहार आणि बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात आले आहे. त्यात हा चांदीचा अस्थिकलश ठेवण्यात आला आहे.बाबासाहेबांनी कामगारमंत्री असताना कामगारांच्या न्यायासाठी सतत लढा दिला. या चळवळीत गिरणी कामगारांचा सक्रिय सहभाग होता. चळवळीला व्यापक स्वरूप मिळाल्याने यातून समता सैनिक दलाची निर्मिती झाली. यात राजाराम कांबळे यांचाही सहभाग होता. मुंबईतील प्रसिद्ध मफतलाल मिलमध्ये ते कामाला होते. या लढ्याच्या निमित्ताने बाबासाहेबांना जवळून बघण्याचे भाग्य त्यांना लाभले. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व भागातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी दाखल झाले. यात समता सैनिक दलाचे राजाराम कांबळे यांचाही सहभाग होता.बाबासाहेबांच्या अंत्यसंस्कारानंतर राजाराम कांबळे त्यांचा अस्थिकलश आपल्या गावी कापडगाव बाैद्धवाडी येथे घेऊन आले. त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने वाडीत १ जानेवारी १९५७ साली छोटेसे बुद्धविहार उभारण्यात आले आणि हा अस्थिकलश या विहारात ठेवण्यात आला. कापडगाववासीय या अस्थिकलशाचे दर्शन दररोज घेत आहेत. राजाराम कांबळे यांचे याठिकाणी भव्य विहार उभारण्याचे स्वप्न होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांचेही निधन झाले आहे. मात्र, वाडीतील साऱ्यांच्या एकोप्यामुळे आता त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास आले आहे.कापडगावात असलेल्या या ऐतिहासिक घटनेची दखल घेत सामाजिक न्याय विभागाने २ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर केला. यातून या बुद्धविहाराची आणि बाबासाहेबांच्या स्मारकाची भव्य वास्तू आकाराला आली आहे. यात तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांची प्रतिमा ठेवण्यात आली असून त्यासमोर बाबासाहेबांच्या अस्थींचा चांदीचा कलश ठेवण्यात आला आहे. शेजारी दोन मजल्यांची इमारतही उभारण्यात आली आहे. यात तळमजला आणि पहिल्या मजल्यावर सभागृह तसेच येणारे भिक्खू गण, बौद्ध उपासक यांच्यासाठी विश्रामगृहाची सोय आहे. दुसऱ्या मजल्यावर विविध ग्रंथ आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके असलेले अद्ययावत वाचनालय उभारण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे.

 

कापडगाव येथे उभारण्यात आलेल्या बुद्धविहारालगतच्या इमारतीत या ग्रामपंचायतीला वाचनालय सुरू करायचे आहे. त्यासाठी त्यांना प्रस्ताव देण्यास सांगितले आहे. प्रस्ताव आल्यानंतर तो मंजुरीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या बार्टी या स्वायत्त संस्थेकडे पाठविण्यात येईल. - यादव गायकवाड, सहायक आयुक्त, समाजकल्याण, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी