शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

भारतीय लष्कराच्या साहसी समुद्र सफरीची रत्नागिरीतून आगेकूच सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 5:40 PM

भारतीय लष्कराच्या ६४ जवानांची १ डिसेंबर रोजी मुंबई येथून सुरू झालेली एका महिना अवधीची साहसी समुद्र सफर रत्नागिरीतून बुधवारी मुंबईकडे रवाना झाली. सैनिकांना दिलेल्या प्रशिक्षणामुळे व त्यांच्या अनुभवामुळे ते वादळामुळे दोन मीटर फुगवटा आलेल्या व जहाजांना अस्थिर करणाऱ्या समुद्रातून मार्गक्रमण करीत पहिले व दुसरे चरण यशस्वीरित्या पार करू शकले.

ठळक मुद्दे४ सी बर्ड प्रजातीच्या जहाजांमधून समुद्र सफर सुरू सफरीमध्ये प्रत्येक जहाजावर ५ अधिकारी अंतिम म्हणजेच चतुर्थ चरणाचा मुंबईकडे प्रवास सुरू

रत्नागिरी : भारतीय लष्कराच्या ६४ जवानांची १ डिसेंबर रोजी मुंबई येथून सुरू झालेली एका महिना अवधीची साहसी समुद्र सफर रत्नागिरीतून बुधवारी मुंबईकडे रवाना झाली.४ सी बर्ड प्रजातीच्या जहाजांमधून सुरू असलेल्या समुद्र सफरीमध्ये प्रत्येक जहाजावर ५ अधिकारी आहेत. या मोहिमेच्या १२व्या दिवशी म्हणजेच दिनांक १२ डिसेंबर रोजी रत्नागिरी किनाऱ्यावर येताच या जहाजांनी चार चरणांत पार पाडावयाच्या या सफरीचे तृतीय चरण यशस्वीरित्या पार पाडले आणि दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता भगवती जेटीवरून मुंबईकडे रवाना झालेल्या जहाजांचा अंतिम म्हणजेच चतुर्थ चरणाचा प्रवास सुरू झाला.

यातील प्रथम चरण मुंबई ते रत्नागिरी तर द्वितीय चरण रत्नागिरी ते गोवा या प्रवासाचे होते. याआधी ही जहाजे प्रथम चरणांती दिनांक ३ डिसेंबर रोजी रत्नागिरी किनाऱ्यावर आली होती.प्रत्येक चरणानंतर नवीन सैनिकांना पाचारण करून सर्वांना संधी दिली जात आहे. यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचा तसेच राष्ट्रीय नौकायान अजिंक्यपद विजेते सैनिकांचादेखील समावेश आहे. या सफारीनंतर त्यांना समुद्रातील सर्वात कठीण परिस्थितीचा सामना करण्याचा अनुभव मिळत आहे.परतीचा प्रवास हा शांत समुद्रामुळे नौकायनासाठी अनुकूल ठरत आहे. चतुर्थ चरण मुंबई येथे पूर्ण होणार आहे. भारतीय लष्करातर्फे अनेकवेळा अशा समुद्र्र सफरींचे आयोजन केले जाते. पण, ही पहिलीच वेळ आहे की, ज्यात इतक्या मोठ्या संख्येने सैनिकांना सहभागी करून घेण्यात आले. या सफरीचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल भुवन खरे यांच्याकडे आहे.

रत्नागिरी येथे भारतीय तटरक्षक दलातर्फे त्यांच्या आय सी-३०२ या नौकेने समुद्र्र सफरीवरील या जहाजांचे मार्गदर्शन केले. या सफरीसाठी त्यांना रसद व आवश्यक ती मदत पुरवण्यात आली. नौदलाचे आयएनएस तराशा हे जहाज या सफरीबरोबर सदैव तैनात ठेवले आहे. अशी साहसी कृत्ये ही भारतीय सेना दलांची ओळख असून, यामुळे सैनिकांमध्ये ऐक्य, संघभाव, समन्वय, जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती इत्यादी गुणांची जोपासना होते.ओखी वादळाचे आव्हानप्रवासातील प्रथम दिवस शांत समुद्रामुळे सफरीसाठी अनुकूल ठरला, तर दुसऱ्या दिवसापासून नौकायन ओखी या सागरी वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे आव्हानात्मक ठरले होते. सैनिकांना दिलेल्या प्रशिक्षणामुळे व त्यांच्या अनुभवामुळे ते वादळामुळे दोन मीटर फुगवटा आलेल्या व जहाजांना अस्थिर करणाऱ्या समुद्रातून मार्गक्रमण करीत पहिले व दुसरे चरण यशस्वीरित्या पार करू शकले.मुंबई ते रत्नागिरी खडतर प्रवासओखी वादळामुळे समुद्र सफरीत अनेक अडचणी आल्या. मात्र, तरीही सैनिकांनी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. परतीच्या प्रवासाच्या वेळी समुद्र शांत असल्याने हा प्रवास सुखकर होणार आहे. मात्र, मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास खूपच खडतर होता.

समुद्रातील वादळामुळे जीव मुठीत धरूनच सागरी प्रवास करावा लागला. मात्र, आम्ही डगमगलो नाही. उलट हे सर्व जास्त  चॅलेंजिंग होते अन् आम्ही आव्हाने स्वीकारणारी माणसे आहोत. त्यामुळे हा आव्हानात्मक वाटणारा प्रवास आम्ही पार केला, अशा शब्दात या जहाजावरील लष्करी जवानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रवासाबाबत त्यांनी अनेक आठवणी यावेळी सांगितल्या. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJNPTजेएनपीटी