शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वादळाच्या इशाऱ्यामुळे बागायतदार चिंतेत, कोकणात पावसाची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 12:31 IST

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात वादळाचा प्रभाव सुरू झाला असून, येत्या आठवड्यात गुरुवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत दक्षिण ...

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात वादळाचा प्रभाव सुरू झाला असून, येत्या आठवड्यात गुरुवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अपेक्षित गारठा नसून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.बंगालच्या उपसागरात मंदूस चक्रीवादळाची निर्मिती झाली. पूर्व किनाऱ्याकडे झेपावत असलेले वादळ पूर्व किनाऱ्यावरील पदुच्चेरी, श्रीहरिकोटा ते महाबलीपूरम दरम्यान किनाऱ्याला धडकले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या शक्यतेने गारठा गायब झाला असून, तापमानातही किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. थंडी पुन्हा गायब झाल्याने पहिल्याच टप्प्यात आंबा बागायतदारांच्या समस्येत वाढ झाली आहे.पावसाच्या शक्यतेने बागायतदारांपुढे कीडरोग संरक्षक फवारण्या व त्यावरील खर्च वाढणार आहे. सध्या केवळ पालवी असून, किरकोळ आलेला मोहोर व पालवीच संरक्षण करण्यासाठी बागायतदारांना हवामानाचा अंदाज घेत फवारण्या कराव्या लागत आहेत. पालवीचे मोहोरात व मोहोराचे फळात रूपांतर होत असताना प्रतिकूल हवामानाचा सामना बागायतदारांना करावा लागत आहे. वेळोवेळी फवारण्या कराव्या लागत असल्याने आंबा उत्पादन खर्चिक बनले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणRainपाऊसMangoआंबाFarmerशेतकरी