शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

इतिहासकालीन राजापूर, कडक उन्हाळ्यातही १४ कुंडांमध्ये पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 13:32 IST

कडक उन्हाच्या झळा आता अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीने तळ गाठला असून, सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले असतानाच राजापूर तालुक्यातील गंगाक्षेत्री असणाऱ्या १४ कुंडांमध्ये मात्र आजही पुरेसे पाणी उपलब्ध आहे.

ठळक मुद्देइतिहासकालीन राजापूर, कडक उन्हाळ्यातही १४ कुंडांमध्ये पाणीसाठापाण्याचे दुर्भीक्ष्य असतानाही गंगाक्षेत्री मुबलक पाणी, स्नानासाठी भाविकांची गर्दी

राजापूर : कडक उन्हाच्या झळा आता अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीने तळ गाठला असून, सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले असतानाच राजापूर तालुक्यातील गंगाक्षेत्री असणाऱ्या १४ कुंडांमध्ये मात्र आजही पुरेसे पाणी उपलब्ध आहे.इतिहासकालीन राजापूर शहराची ओळख सांगणारे महत्वाचे स्थान म्हणजे गंगाकुंड. मागील अनेक वर्षे दर तीन वर्षांनी याठिकाणी गंगा अवतीर्ण होते. त्यानंतर काही महिन्यांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते, असा तिचा प्रघात राहिला आहे.

मात्र, अलिकडच्या काही वर्षात गंगेचे आगमन व निर्गमन या प्रथेमध्ये बदल झाला असून, आता तर तिचे तीन वर्षांपूर्वीच आगमन व दीर्घकालानंतर निर्गमन असा क्रम सुरु आहे. यापूर्वी तर सलग दोन वर्षे गंगेचे आगमन झाले आहे.साधारणपणे नोव्हेंबर ते मे असा गंगेचा आगमन कालावधी राहिला आहे. जूनमध्येदेखील तिचे आगमन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना त्यावेळी डोंगरांनी वेढलेल्या भागात एकाचवेळी १४ कुंडात पाणी उपलब्ध होते व त्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होऊनदेखील पाण्याचे प्रमाण जसेच्या तसे राहात असल्याचे पाहायला मिळते.गंगाक्षेत्री काशीकुंडातील पाणी देण्यासाठी गंगापुत्र उपस्थित असतात. मात्र, तशी व्यवस्था अन्य कुंडात नसल्याने अनेकवेळा स्नानासाठी आलेले भाविक कुंडात उतरुन स्वत:च स्नान करतात. शिवाय इतरांनाही पाणी काढून देतात. पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊनही या कुंडातील पाण्याच्या पातळीत घट झालेली नाही.बारमाही उष्ण झराराजापूर शहरापासून सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे गंगाक्षेत्र आहे. त्यालगतच बारमाही वाहणारे उष्ण पाण्याचे झरे म्हणजेच उन्हाळे हा भाग येतो. गंगाक्षेत्रावर येणारे भाविक प्रथम उन्हाळे येथे जावून गरम पाण्यात स्नानाचा लाभ घेतात. या पाण्यातही गंधकाचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. याठिकाणी आंघोळ करून भाविक गंगाक्षेत्रावर येतात.

टॅग्स :Rajapurchi Gangaराजापूरची गंगाRatnagiriरत्नागिरी