शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

रत्नागिरीत धुवांधार पाऊस, दोन मोठ्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 19:10 IST

पावसाळ्यात खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वर, लांजा तालुक्यामधून जाणारी काजळी आणि शास्त्री या नद्यांना पूर येत असल्याने या नद्यांच्या परिसरातील शहरे आणि गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो.

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य नसले तरीही रात्री मुसळधारेने पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जगबुडी आणि काजळी या दोन मोठ्या नद्यांनी आज, सोमवारी इशारा पातळी ओलांडली. दरम्यान, हवामान खात्याने कोकणात पुढील चार दिवस ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीत रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.जिल्ह्यात जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काज़ळी, कोदवली, मुचकुंदी, बावनदी या मुख्य नद्या आहेत. पावसाळ्यात या सर्वच नद्या दुथडी भरून वाहतात. मात्र, पावसाळ्यात खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वर, लांजा तालुक्यामधून जाणारी काजळी आणि शास्त्री या नद्यांना पूर येत असल्याने या नद्यांच्या परिसरातील शहरे आणि गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह अन्य कोकण भागात पावसाने सुरुवात केली आहे. अजूनही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने यापैकी काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. यात खेडमधील जगबुडी आणि संगमेश्वर - लांजा तालुक्यातील काजळी या नद्यांचा समावेश आहे. तसेच वाशिष्ठी नदीच्या पातळीतही वाढ झाली आहे.जगबुडी नदीची इशारा पातळी ५ मीटर तर धोक्याची पातळी ७ मीटर इतकी आहे. मात्र, सायंकाळी या नदीची पाणी पातळी ६.५० मीटर इतकी झाली होती. तर काजळी नदीची इशारा पातळी १६.५० मीटर तर धोक्याची पातळी १८ मीटर इतकी आहे. सोमवारी सायंकाळी या नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ती १७ मीटरपेक्षा अधिक वाढली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदीWaterपाणी