शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

रत्नागिरीत धुवांधार पाऊस, दोन मोठ्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 19:10 IST

पावसाळ्यात खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वर, लांजा तालुक्यामधून जाणारी काजळी आणि शास्त्री या नद्यांना पूर येत असल्याने या नद्यांच्या परिसरातील शहरे आणि गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो.

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य नसले तरीही रात्री मुसळधारेने पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जगबुडी आणि काजळी या दोन मोठ्या नद्यांनी आज, सोमवारी इशारा पातळी ओलांडली. दरम्यान, हवामान खात्याने कोकणात पुढील चार दिवस ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीत रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.जिल्ह्यात जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काज़ळी, कोदवली, मुचकुंदी, बावनदी या मुख्य नद्या आहेत. पावसाळ्यात या सर्वच नद्या दुथडी भरून वाहतात. मात्र, पावसाळ्यात खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वर, लांजा तालुक्यामधून जाणारी काजळी आणि शास्त्री या नद्यांना पूर येत असल्याने या नद्यांच्या परिसरातील शहरे आणि गावांना दरवर्षीच पुराचा सामना करावा लागतो.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह अन्य कोकण भागात पावसाने सुरुवात केली आहे. अजूनही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने यापैकी काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. यात खेडमधील जगबुडी आणि संगमेश्वर - लांजा तालुक्यातील काजळी या नद्यांचा समावेश आहे. तसेच वाशिष्ठी नदीच्या पातळीतही वाढ झाली आहे.जगबुडी नदीची इशारा पातळी ५ मीटर तर धोक्याची पातळी ७ मीटर इतकी आहे. मात्र, सायंकाळी या नदीची पाणी पातळी ६.५० मीटर इतकी झाली होती. तर काजळी नदीची इशारा पातळी १६.५० मीटर तर धोक्याची पातळी १८ मीटर इतकी आहे. सोमवारी सायंकाळी या नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ती १७ मीटरपेक्षा अधिक वाढली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदीWaterपाणी