शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

rain update Ratnagiri: जगबुडी, काजळी नद्या धोका पातळीवर; अनेक गावचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:25 IST

अनेक भागात दरडी कोसळल्या.

रत्नागिरी : जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर अधिकच वाढला. त्यामुळे जिल्ह्यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक गावांमधील पुलावरून पाणी वाहू लागल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक भागात दरड कोसळली आहे. दरम्यान, लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरून पाणी वाहू लागल्याने या पुलावरील दोन्ही बाजुंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले असून चार दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.

रघुवीर घाटात दरड कोसळलीखेड तालुक्यातील जगबुडी नदीने दोन दिवसांतच इशारा पातळी ओलांडली आहे. रविवारपासून पावसाचा जाेर अधिकच वाढल्याने जगबुडी नदीपाठोपाठ उंच पात्र असलेल्या काजळी नदीनेही धोका पातळी ओलांडली आहे. साेमवारी रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळण्याचे सत्र सुरू झाल्याने दरड बाजुला करण्याचे काम बराच वेळ सुरू होते.

गावांना सतर्कतेचा इशाराखेडमधील जगबुडी नदी आणि संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातील काजळी नद्यांचे पात्र धोका पातळीच्याही वर आल्याने आजुबाजुंच्या गावांमध्ये पाणी भरू लागले आहे. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरुन पाणी वाहू लागल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच संगमेश्वरमधील शास्त्री नदी, बावनदी, राजापुरातील कोदवली या नद्यांचे पात्र इशारा पातळीवरून वाहात आहे. काही गावांमधील पूलही पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्कही तुटला आहे. त्यामुळे या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.रत्नागिरी तालुक्यातही खेडशी येथे सकाळी घराशेजारी दरड कोसळली आहे. तर चांदेराई, हरचेरी आदी गावांमध्ये पुलाखालून पाणी वाहू लागले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लांजात सर्वाधिक पावसाची नोंदगेल्या २४ तासात जिल्ह्यात १६४३ मिलीमीटर (१८२.५६ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे. लांजात सर्वाधिक २९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असूनमंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांमध्येही २०० ते २२० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल रत्नागिरी, संगमेश्वर, राजाापूर आणि खेड या तालुक्यांमध्येही अतिवृष्टीची नोंद आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदीWaterपाणी