शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

rain update Ratnagiri: जगबुडी, काजळी नद्या धोका पातळीवर; अनेक गावचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:25 IST

अनेक भागात दरडी कोसळल्या.

रत्नागिरी : जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर अधिकच वाढला. त्यामुळे जिल्ह्यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक गावांमधील पुलावरून पाणी वाहू लागल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक भागात दरड कोसळली आहे. दरम्यान, लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरून पाणी वाहू लागल्याने या पुलावरील दोन्ही बाजुंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले असून चार दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.

रघुवीर घाटात दरड कोसळलीखेड तालुक्यातील जगबुडी नदीने दोन दिवसांतच इशारा पातळी ओलांडली आहे. रविवारपासून पावसाचा जाेर अधिकच वाढल्याने जगबुडी नदीपाठोपाठ उंच पात्र असलेल्या काजळी नदीनेही धोका पातळी ओलांडली आहे. साेमवारी रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळण्याचे सत्र सुरू झाल्याने दरड बाजुला करण्याचे काम बराच वेळ सुरू होते.

गावांना सतर्कतेचा इशाराखेडमधील जगबुडी नदी आणि संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातील काजळी नद्यांचे पात्र धोका पातळीच्याही वर आल्याने आजुबाजुंच्या गावांमध्ये पाणी भरू लागले आहे. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरुन पाणी वाहू लागल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच संगमेश्वरमधील शास्त्री नदी, बावनदी, राजापुरातील कोदवली या नद्यांचे पात्र इशारा पातळीवरून वाहात आहे. काही गावांमधील पूलही पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्कही तुटला आहे. त्यामुळे या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.रत्नागिरी तालुक्यातही खेडशी येथे सकाळी घराशेजारी दरड कोसळली आहे. तर चांदेराई, हरचेरी आदी गावांमध्ये पुलाखालून पाणी वाहू लागले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लांजात सर्वाधिक पावसाची नोंदगेल्या २४ तासात जिल्ह्यात १६४३ मिलीमीटर (१८२.५६ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे. लांजात सर्वाधिक २९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असूनमंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांमध्येही २०० ते २२० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल रत्नागिरी, संगमेश्वर, राजाापूर आणि खेड या तालुक्यांमध्येही अतिवृष्टीची नोंद आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदीWaterपाणी