शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

rain update Ratnagiri: जगबुडी, काजळी नद्या धोका पातळीवर; अनेक गावचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:25 IST

अनेक भागात दरडी कोसळल्या.

रत्नागिरी : जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर अधिकच वाढला. त्यामुळे जिल्ह्यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक गावांमधील पुलावरून पाणी वाहू लागल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक भागात दरड कोसळली आहे. दरम्यान, लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरून पाणी वाहू लागल्याने या पुलावरील दोन्ही बाजुंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले असून चार दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.

रघुवीर घाटात दरड कोसळलीखेड तालुक्यातील जगबुडी नदीने दोन दिवसांतच इशारा पातळी ओलांडली आहे. रविवारपासून पावसाचा जाेर अधिकच वाढल्याने जगबुडी नदीपाठोपाठ उंच पात्र असलेल्या काजळी नदीनेही धोका पातळी ओलांडली आहे. साेमवारी रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळण्याचे सत्र सुरू झाल्याने दरड बाजुला करण्याचे काम बराच वेळ सुरू होते.

गावांना सतर्कतेचा इशाराखेडमधील जगबुडी नदी आणि संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातील काजळी नद्यांचे पात्र धोका पातळीच्याही वर आल्याने आजुबाजुंच्या गावांमध्ये पाणी भरू लागले आहे. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरुन पाणी वाहू लागल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच संगमेश्वरमधील शास्त्री नदी, बावनदी, राजापुरातील कोदवली या नद्यांचे पात्र इशारा पातळीवरून वाहात आहे. काही गावांमधील पूलही पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्कही तुटला आहे. त्यामुळे या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.रत्नागिरी तालुक्यातही खेडशी येथे सकाळी घराशेजारी दरड कोसळली आहे. तर चांदेराई, हरचेरी आदी गावांमध्ये पुलाखालून पाणी वाहू लागले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लांजात सर्वाधिक पावसाची नोंदगेल्या २४ तासात जिल्ह्यात १६४३ मिलीमीटर (१८२.५६ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे. लांजात सर्वाधिक २९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असूनमंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांमध्येही २०० ते २२० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल रत्नागिरी, संगमेश्वर, राजाापूर आणि खेड या तालुक्यांमध्येही अतिवृष्टीची नोंद आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदीWaterपाणी