शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दरड कोसळली; पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 11:30 AM

Rain Ratnagiri-राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोपडले आहे. या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या निवळी घाटात दरड कोसळली. यामुळे मध्यरात्री २ वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दरड कोसळलीपुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

रत्नागिरी-राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोपडले आहे. या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या निवळी घाटात दरड कोसळली. यामुळे मध्यरात्री २ वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.माहितीनुसार, आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली नाही आहे. दरम्यान पुढील ३ दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. २० जूनपर्यंत मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी पुराचे पाणी वस्तीत आणि शेतात घुसले आहे.आता कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.काल, बुधवारी रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्टी, काजळी, कोदवली, शास्त्री ,सोनवी, मुच्कुंडी, बावनदी इ. नद्या ओसंडून वाहत असून धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचल्या होत्या. पण रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नाही. तरी काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरम्यान चिपळूणमध्ये रात्रभरापासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीचे पाणी पहाटे ३ वाजता शिरण्यास सुरुवात झाली होती. पण पावसाचा जोर ओसरल्याने पुराचा धोका टळला. आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस सुरू आहे. जोर कमी असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. पण तरीही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. समुद्रलगतच्या रहिवाशांना इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी