शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 17:47 IST

गेल्या दोन दिवसांपासून जलद गतीने प्रवास करत असलेला मान्सून अखेर मुंबई, ठाणे आणि कोकणातील बऱ्याच भागांमध्ये येऊन धडकला आहे.

रत्नागिरी : मान्सून कोकणच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, येत्या ४८ तासांमध्ये कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने मान्सून अलर्ट जारी केला आहे. उर्वरित विभागात येणाऱ्या पाच दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि परिसरातही मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.येत्या ४८ तासांत कोकणात मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पोषक वातावरणाने गेल्या दोन दिवसांपासून जलद गतीने प्रवास करत असलेला मान्सून अखेर मुंबई, ठाणे आणि कोकणातील बऱ्याच भागांमध्ये येऊन धडकला आहे.दुसरीकडे, कोकणसह गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पाँडिचेरी भागात येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि तामिळनाडू तसंच विदर्भ आणि तेलंगणाच्या काही भागात पोहोचेल.अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाच्या प्रवासाला ९ जूनपासून चांगली चालना मिळाली आहे. पोषक वातावरण तयार झाल्याने १० जूनला पावसाने गोवा पार करून दक्षिण कोकणातून पूर्वमोसमी पावसाने हलकी चाहूल दिली. सध्या मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल वातावरण असल्याने पुढील ४८ तासांमध्ये मान्सूनचा प्रवास देशव्यापी होत जाईल.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसweatherहवामान