शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

रत्नागिरीत रात्री मुसळधार; दिवसा उन्हाचा कडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:56 IST

सध्या शेतकऱ्यांसह नागरिक मान्सून नियमित होण्याची प्रतीक्षा करत आहेत

रत्नागिरी : पावसाने गेल्या काही दिवसांपासून रात्री मुसळधारेने पडण्यास सुरूवात केली आहे. मात्र, दिवसा कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. रविवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली हाेती. साेमवारी सकाळीही पावसाचा जाेर कायम हाेता. मात्र, त्यानंतर कडक ऊन पडले हाेते.पावसाने मे महिन्यात जोरदार वृष्टी केली असली, तरी मे महिन्याच्या शेवटच्या तीन-चार दिवसांपासून विश्रांती घेण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याकडून अधूनमधून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पावसाचा जोर कमी झाला आहे.रविवारी दिवसभर पावसाचे वातावरण होते. त्यामुळे किरकोळ सरी पडतील, असे वाटत होते. मात्र, पावसाने हुलकावणीच दिली होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह विजांच्या लखलखाटात पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जाेर पाहता मान्सूनचे आगमन झाल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली गेली. मात्र, हा पाऊस जिल्ह्यातील काही भागातच पडला तर काही भाग काेरडेच राहिले.सोमवारी सकाळी आभाळ ढगाळलेले असल्याने जोरदार पावसाची शक्यता वाटत होती. मात्र, सकाळी एकच सर कोसळल्यानंतर पावसाने पुन्हा दिवसभर विश्रांती घेतली हाेती. त्यामुळे उकाडा वाढला. अधूनमधून ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाची दिवसभर पाठच होती. परंतु, वातावरणातील बदल पाहता रात्री जोरदार वृष्टी होण्याची शक्यता वाटत होती.दरम्यान, हवामान खात्याने १० ते १२ जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, सध्या दिवसभर वातावरण कोरडे राहात असून, रात्री पावसाचा जोर वाढलेला असतो. परंतु, दिवसा उन्हामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसह नागरिक मान्सून नियमित होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसTemperatureतापमानFarmerशेतकरी