शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रत्नागिरीतून हापूसची युरोपला निर्यात, साडेचारशे डझन हापूस आंब्यावर प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 5:03 PM

पणन मंडळाच्या रत्नागिरी पॅक हाऊसमधून साडेचारशे डझन हापूस आंब्यावर प्रक्रिया करून युरोपसाठी निर्यात करण्यात आला आहे. पणन मंडळाच्या रत्नागिरीतील पॅक हाऊसला क्वारंटाइन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे उष्णजल प्रक्रिया सुरू झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतून हापूसची युरोपला निर्यातसाडेचारशे डझन हापूस आंब्यावर प्रक्रिया

रत्नागिरी : पणन मंडळाच्या रत्नागिरी पॅक हाऊसमधून साडेचारशे डझन हापूस आंब्यावर प्रक्रिया करून युरोपसाठी निर्यात करण्यात आला आहे. पणन मंडळाच्या रत्नागिरीतील पॅक हाऊसला क्वारंटाइन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे उष्णजल प्रक्रिया सुरू झाली आहे.पॅक हाऊसमधून रशियाला बाराशे किलो आंबा निर्यात करण्यात आला आहे. फळमाशीविरहीत हापूसची मागणी रशियाने केली होती. त्यामुळे रत्नागिरीतील पॅक हाऊसमध्ये आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करण्यात आली आहे.

फळमाशीचे कारण देत युरोपीय देशांनी आंबा आयातीवर बंदी आणली होती. उष्णजल किंवा बाष्पजल प्रक्रिया करण्याला अखेर मान्यता देण्यात आली होती. हापूसची साल पातळ आहे. परंतु ४७ अंश सेल्सिअसला ५० मिनिटे आंब्यावर प्रक्रिया करावी, अशी सूचना करण्यात आली होती.

याबाबत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून अहवाल अपेडाकडे पाठविला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्यामुळे जुन्या निकषाव्दारेच आंब्यावर प्रक्रिया सुरू आहे.क्वारंटाइन विभागाकडून पॅक हाऊसला नाहरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे रत्नागिरीतून होणारी थेट निर्यात रखडली होती. दोन वर्षे रत्नागिरी पॅक हाऊसमधून आंबा परदेशात निर्यात करण्यात आला नव्हता.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून पॅक हाऊससाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्यांसाठीची जबाबदारीसद्गुरू एंटरप्रायझेसह्णकडे देण्यात आली होती. क्वारंटाईन विभागाकडे नाहरकत दाखल्यासाठी प्रस्ताव केल्यानंतर अपेडाचे पथक नुकतेच रत्नागिरीत दाखल झाले होते. त्यांनी पॅक हाऊसची पाहणी केल्यानंतर उष्णजल प्रक्रियेसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.पणन मंडळाच्या पॅक हाऊसमध्ये २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात आंबा प्री-कुलिंग केला जातो. त्यानंतर ४८ अंश सेल्सिअसला ६० मिनिटे आंबा ठेवून उष्णजल प्रक्रिया करण्यात येते. वॉशिंग व ब्रशिंग केल्यानंतर आंबा पॅक केला जातो. उष्णजल प्रक्रियेसाठी ७२० किलो व २४० किलो एवढ्या क्षमतेचे दोन टँक आहेत.

पणन विभागातील प्रक्रियेनंतर सीलबंद वाहनातून आंबा मुंबईत पाठविण्यात येतो. उष्णजल प्रक्रियेसाठी किलोला साडेआठ रूपये तर पॅकिंगसाठी ७ रूपये दर आकारण्यात येत आहे. रत्नागिरीच्या पॅक हाऊससाठी परवानगी मिळाल्यामुळे येथील आंबा थेट युरोपला रवाना होणार आहे. आतापर्यंत लासलगाव येथे आंबा प्रक्रियेसाठी पाठविण्यात येत होता. मात्र, आता आंब्याचा हा द्रविडी प्राणायाम बंद झाला असून, थेट विमानतळावर आंबा जाणार आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाkonkanकोकण