शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

धान्य दुकानदारांचा प्रश्न गंभीरच

By admin | Updated: March 25, 2015 00:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार : प्रणाली कोलमडण्याची भीती

खेड : रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य व केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यातील धान्य दुकानदार पार मेटाकुटीस आला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना प्रत्यक्षात कृतीत येत नसल्याने त्याचा फटका धान्य दुकानदारांना बसत आहे. आपल्या कोणत्याही मागण्यांकडे लक्ष देण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ दि. १ एप्रिलपासून दुकानदारांनी बंद पुकारला आहे.केंद्र व राज्याच्या धोरणामुळे धान्याचा खडखडाट असून, सामान्यांना धान्य मिळणेही कठीण होऊन बसले आहे. रेशन दुकानात खडखडाट होत आहे. सरकारने दुकानदारांना देऊ केलेल्या सवलती मोडीत काढल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात हा बंद पुकारण्यात येत आहे.रेशनवर मिळणारे धान्य, धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या सवलती, पूर्वी घोषित झालेल्या सवलती, रसकारचा नाकर्तेपणा याबाबत तालुकास्तरावर अशी निवेदने देण्यात आली होती. शासन व धान्य दुकानदार यांच्यातील संघर्षात शिधापत्रिकाधारकांचे मात्र हाल होत आहेत. राज्य सरकारने याकामी ठोस पावले उचलावी, अशी मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अशोक कदम यांनी दिली आहे.केंद्र सरकारने सरकारने मार्च २०१४ रोजी अन्न सुरक्षा योजना सुरू केली़ या योजनेद्वारे गरीबांना आणि केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य पुरवण्यात येत आहे. या योजनेमध्ये रेशन दुकानदारांना मात्र अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. गेली पंधरा वर्षे रेशन दुकानदार संघटनेने याबाबतचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडली होती़ मात्र, काहीही निर्णय होऊ शकला नाही़ आता वर्र्षभरापुर्वी याबाबत राज्य सरकारने रेशन दुकानदारांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या़ यामध्ये रेशन दुकानदार धान्य आणताना गोडाऊन ते अगदी दुकानापर्यंत आकारायचे भाडे हे सरकारने द्यायचे, असे ठरवण्यात आले होते़ याशिवाय अनेक प्रश्न सरकार दरबारी बैठकीत मान्य करण्यात आले होते. मात्र, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही यातील एकही मागणी या सरकारने पूर्ण केली नाही. यामुळे रेशन दुकानदारांमध्ये सरकारबाबत असंतोष आहे.दि. २५ रोजी रेशन दुकानदार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दुकानदार शिष्टमंडळ भेटणार आहे. यावेळी ठोस निर्णय न झाल्यास १ एप्रिलपासून रेशन दुकान बंद आंदोलन सुरू होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हापातळीवरील अध्यक्ष अशोक कदम यांनी दिली आहे. ़(प्रतिनिधी)