शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

धान्य दुकानदारांचा प्रश्न गंभीरच

By admin | Updated: March 25, 2015 00:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार : प्रणाली कोलमडण्याची भीती

खेड : रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य व केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यातील धान्य दुकानदार पार मेटाकुटीस आला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना प्रत्यक्षात कृतीत येत नसल्याने त्याचा फटका धान्य दुकानदारांना बसत आहे. आपल्या कोणत्याही मागण्यांकडे लक्ष देण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ दि. १ एप्रिलपासून दुकानदारांनी बंद पुकारला आहे.केंद्र व राज्याच्या धोरणामुळे धान्याचा खडखडाट असून, सामान्यांना धान्य मिळणेही कठीण होऊन बसले आहे. रेशन दुकानात खडखडाट होत आहे. सरकारने दुकानदारांना देऊ केलेल्या सवलती मोडीत काढल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात हा बंद पुकारण्यात येत आहे.रेशनवर मिळणारे धान्य, धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या सवलती, पूर्वी घोषित झालेल्या सवलती, रसकारचा नाकर्तेपणा याबाबत तालुकास्तरावर अशी निवेदने देण्यात आली होती. शासन व धान्य दुकानदार यांच्यातील संघर्षात शिधापत्रिकाधारकांचे मात्र हाल होत आहेत. राज्य सरकारने याकामी ठोस पावले उचलावी, अशी मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अशोक कदम यांनी दिली आहे.केंद्र सरकारने सरकारने मार्च २०१४ रोजी अन्न सुरक्षा योजना सुरू केली़ या योजनेद्वारे गरीबांना आणि केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य पुरवण्यात येत आहे. या योजनेमध्ये रेशन दुकानदारांना मात्र अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. गेली पंधरा वर्षे रेशन दुकानदार संघटनेने याबाबतचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडली होती़ मात्र, काहीही निर्णय होऊ शकला नाही़ आता वर्र्षभरापुर्वी याबाबत राज्य सरकारने रेशन दुकानदारांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या़ यामध्ये रेशन दुकानदार धान्य आणताना गोडाऊन ते अगदी दुकानापर्यंत आकारायचे भाडे हे सरकारने द्यायचे, असे ठरवण्यात आले होते़ याशिवाय अनेक प्रश्न सरकार दरबारी बैठकीत मान्य करण्यात आले होते. मात्र, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही यातील एकही मागणी या सरकारने पूर्ण केली नाही. यामुळे रेशन दुकानदारांमध्ये सरकारबाबत असंतोष आहे.दि. २५ रोजी रेशन दुकानदार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दुकानदार शिष्टमंडळ भेटणार आहे. यावेळी ठोस निर्णय न झाल्यास १ एप्रिलपासून रेशन दुकान बंद आंदोलन सुरू होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हापातळीवरील अध्यक्ष अशोक कदम यांनी दिली आहे. ़(प्रतिनिधी)