शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

धान्य दुकानदारांचा प्रश्न गंभीरच

By admin | Updated: March 25, 2015 00:45 IST

जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार : प्रणाली कोलमडण्याची भीती

खेड : रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य व केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यातील धान्य दुकानदार पार मेटाकुटीस आला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना प्रत्यक्षात कृतीत येत नसल्याने त्याचा फटका धान्य दुकानदारांना बसत आहे. आपल्या कोणत्याही मागण्यांकडे लक्ष देण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ दि. १ एप्रिलपासून दुकानदारांनी बंद पुकारला आहे.केंद्र व राज्याच्या धोरणामुळे धान्याचा खडखडाट असून, सामान्यांना धान्य मिळणेही कठीण होऊन बसले आहे. रेशन दुकानात खडखडाट होत आहे. सरकारने दुकानदारांना देऊ केलेल्या सवलती मोडीत काढल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात हा बंद पुकारण्यात येत आहे.रेशनवर मिळणारे धान्य, धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या सवलती, पूर्वी घोषित झालेल्या सवलती, रसकारचा नाकर्तेपणा याबाबत तालुकास्तरावर अशी निवेदने देण्यात आली होती. शासन व धान्य दुकानदार यांच्यातील संघर्षात शिधापत्रिकाधारकांचे मात्र हाल होत आहेत. राज्य सरकारने याकामी ठोस पावले उचलावी, अशी मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अशोक कदम यांनी दिली आहे.केंद्र सरकारने सरकारने मार्च २०१४ रोजी अन्न सुरक्षा योजना सुरू केली़ या योजनेद्वारे गरीबांना आणि केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य पुरवण्यात येत आहे. या योजनेमध्ये रेशन दुकानदारांना मात्र अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. गेली पंधरा वर्षे रेशन दुकानदार संघटनेने याबाबतचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडली होती़ मात्र, काहीही निर्णय होऊ शकला नाही़ आता वर्र्षभरापुर्वी याबाबत राज्य सरकारने रेशन दुकानदारांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या़ यामध्ये रेशन दुकानदार धान्य आणताना गोडाऊन ते अगदी दुकानापर्यंत आकारायचे भाडे हे सरकारने द्यायचे, असे ठरवण्यात आले होते़ याशिवाय अनेक प्रश्न सरकार दरबारी बैठकीत मान्य करण्यात आले होते. मात्र, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही यातील एकही मागणी या सरकारने पूर्ण केली नाही. यामुळे रेशन दुकानदारांमध्ये सरकारबाबत असंतोष आहे.दि. २५ रोजी रेशन दुकानदार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दुकानदार शिष्टमंडळ भेटणार आहे. यावेळी ठोस निर्णय न झाल्यास १ एप्रिलपासून रेशन दुकान बंद आंदोलन सुरू होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हापातळीवरील अध्यक्ष अशोक कदम यांनी दिली आहे. ़(प्रतिनिधी)