शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कोकण वैधानिक मंडळासाठी सरकार पुन्हा केंद्राकडे पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 13:57 IST

कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या ठरावाचा राज्य सरकारकडून पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार भास्कर जाधव यांच्या तारांकित प्रश्नाला अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देकोकण वैधानिक मंडळासाठी सरकार पुन्हा केंद्राकडे पाठपुरावा करणारअजित पवार यांचे आश्वासन, भास्कर जाधव यांचा तारांकित प्रश्न

चिपळूण : कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या ठरावाचा राज्य सरकारकडून पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आमदार भास्कर जाधव यांच्या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिले.याविषयी आमदार जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्राची विधानसभा अस्तित्वात आल्यापासून कधीही कोकणच्या विकासासंदर्भात स्वतंत्र चर्चा झाली नव्हती. २०१६च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा नियम २९३ च्या प्रस्तावाद्वारे ही चर्चा आपण घडवून आणली.

हा प्रस्ताव मांडताना कोकणाच्या विकासासाठीचे अनेक मुद्दे मांडले आणि त्यावर तत्कालिन मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अत्यंत सकारात्मक उत्तर देऊन अनेक घोषणा केल्या. त्यामध्ये कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असेही आश्वासन होते.

या केलेल्या घोषणांची कार्यवाही सुरू झाली. वैधानिक विकास महामंडळासाठी विधानसभेत करण्यात आलेला ठराव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. त्यावर पत्रव्यवहारही करण्यात आला. परंतु, तत्कालिन सरकारच्या प्रयत्नांना अपेक्षित यश आले नाही.जाधव म्हणाले की, नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील विविध प्रश्नांबरोबरच याविषयीचे प्रश्नदेखील सादर केले होते. मात्र, कोरोनामुळे अवघ्या दोन दिवसांचे अधिवेशन झाले. त्यामुळे मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे संबंधित मंत्र्यांनी लेखी स्वरूपात दिली.

वैधानिक विकास महामंडळाचा प्रश्न अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला होता. त्यावर दिलेल्या उत्तरात पवार यांनी ह्यकोकणाकरिता स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळाचा मुद्दा सातत्याने सभागृहात मांडण्यात येतो.

२०१६च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडलेल्या प्रस्तावावरील चचेर्वेळी या वैधानिक महामंडळाकरिता राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठपुरावा करेलह्ण, असे आश्वासन दिले होते.त्या अनुषंगाने त्यांनी १७ सप्टेंबर २०१६ रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनाकडे विनंती केली आहे. तसेच त्यानंतर २७ सप्टेंबर २०१८ व ७ सप्टेंबर २०१९च्या पत्रान्वये कोकणासाठी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याकरिता सत्वर निर्णय घेण्याची विनंती केंद्र शासनाला केली होती. कोकणाकरिता स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याकरिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३७१ (२)(क)मध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

प्रत्येक अधिवेशनामध्ये मी कोकणच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष करीत आलो आहे. मध्यंतरी काही काळ मला राज्य मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. आता राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमुळे कोकणातील विकासाला निश्चितपणे चालना मिळाली आहे. स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळासारखे काही प्रश्न अजून प्रलंबित आहेत. कोकणची प्रगती व विकासासाठी माझा संघर्ष व पाठपुरावा सतत सुरूच राहील.- भास्कर जाधव,आमदार

टॅग्स :konkanकोकणBhaskar Jadhavभास्कर जाधवguhagar-acगुहागरRatnagiriरत्नागिरी