शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

प्राथमिकसह माध्यमिक शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट, विनायक राऊत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:30 IST

चिपळूण : एकीकडे कोकणसह मुंबईतील मराठी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला असून, दुसरीकडे सरकारमधील ...

चिपळूण : एकीकडे कोकणसह मुंबईतील मराठी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला असून, दुसरीकडे सरकारमधील लोकप्रतिनिधी धनदांडग्या शैक्षणिक संस्थांचे उद्घाटन करीत आहेत. त्यामुळे गरिबांच्या मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होणार आहे. त्याकडे दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे. कोकणात उद्धवसेनेकडून मराठी शाळा वाचवा अभियान सुरू केले जाणार असल्याची माहिती माजी खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.राऊत म्हणाले की, सामान्य घरातील मुलांना मोफत शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. मात्र १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार कोकणातील शिक्षणाचा बट्ट्याबोळ होणार आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरिबांची मुले प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकत होती. अशा अनुदानित शाळा राज्य सरकार बंद करणार आहे. शिक्षकांच्या पगारावर होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना वाव देण्यासाठी सरकारने नवीन धोरण आणले आहे. त्यामुळे सामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद केल्या जाणार नाहीत. केवळ मुंबई आणि कोकणातील अनुदानित शाळा बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे या भागातील पालकमंत्र्यांचे आपल्या जिल्ह्याकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो. राज्य सरकारचे हे धोरण म्हणजे हिंदीची सक्ती, इंग्रजीची भरभराट आणि मराठीला हद्दपार करण्याचा प्रयत्न आहे. नव्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यातील ४२८ माध्यमिक शाळा आणि ५५० प्राथमिक शाळा बंद पडणार आहेत. त्यातून ९७८ शिक्षक अतिरिक्त होतील. यातील काहींचे समायोजन केले जातील. उर्वरित शिक्षक बेरोजगार होणार आहेत, असे ते म्हणाले.डोंगरी भागातील आमच्या मुलांना विशेष सवलत देऊ नका, पण आहे त्या सवलती रद्द करू नका, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, सुधीर शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणVinayak Rautविनायक राऊत MahayutiमहायुतीSchoolशाळा