शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विरेश्वर तलाव स्वच्छतेसाठी शासकीय यंत्रणा सरसावली

By admin | Updated: November 12, 2014 23:31 IST

या तलावाच्या भोवतालचा परिसर हा मॉर्निंग वॉकसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी वापरला जातो.

चिपळूण : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या धर्तीवर केंद्र सरकारने सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाने संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याची मोहीम शासकीय यंत्रणेने हाती घेतली आहे. त्याला आता विविध संघटना व नागरिकांचेही योगदान लाभत आहे. काल (मंगळवारी) उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विरेश्वर कॉलनी परिसर स्वच्छ केला. सकाळी प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या विरेश्वर कॉलनी, विरेश्वर तलाव व विरेश्वर मंदिराचा परिसर शासकीय अधिकारी, कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साफ केला. विरेश्वर तलावाचे सुशोभिकरण करण्यासाठी खासदार फंडातून निधी खर्च करण्यात आला आहे. या तलावाच्या भोवतालचा परिसर हा मॉर्निंग वॉकसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी वापरला जातो. हा परिसर स्वच्छ असावा, तळ्यातील गाळ काढावा व विरेश्वर मंदिर परिसर स्वच्छ करण्याच्या हेतूने ही मोहीम या भागात राबविण्यात आली. उपविभागीय अधिकारी हजारे यांच्याबरोबर तहसीलदार वृषाली पाटील, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नगरसेवक सुचय रेडीज, नगरसेवक शशिकांत मोदी, कैसर देसाई, महेश दीक्षित, स्वच्छता निरीक्षक अनंत हळदे, अशोक साठे, महसूलचे सर्व कर्मचारी, नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, डी. बी. जे. महाविद्यालयाचे विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. चिपळूण एस. टी. स्टॅण्डच्या मागील परिसरही या पथकाने स्वच्छ केला.या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांचे उपविभागीय अधिकारी हजारे यांनी आभार मानले. ही चळवळ यापुढे अखंड सुरु ठेवावी, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)भारत सरकारच्या आवाहनाला शासकीय यंत्रणेने प्रतिसाद दिला आहे. पण, नागरिकांनीही यात सहभाग घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. स्वच्छ भारत अभियान ही चळवळ शासकीय अधिकाऱ्यांसाठी नाही तर ती सर्वसामान्यांसाठी आहे, याची जाणीव नागरिकांनीही ठेवायला हवी. तसे घडले तरच हे अभियान यशस्वी होणार आहे.परिसर स्वच्छतेसाठी उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील यांनी घेतली हाती झाडू.विरेश्वर तलाव व परिसरातील उद्यान स्वच्छ केल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दिलासा. विरेश्वर मंदिर, विरेश्वर तलाव व विरेश्वर कॉलनी परिसर झाला चकाचक चिपळूण नगर परिषद कर्मचारी, डी. बी. जे. महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी घेतली मेहनत. चिपळूण शहरातील विरेश्वर कॉलनी येथे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, कैसर देसाई, नगरसेवक शशिकांत मोदी, मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी पुढाकार घेऊन साफसफाई केली.