शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

गॅसवाहू टँकर उलटला, मुंबई-गोवा महामार्ग १५ तास बंद; रत्नागिरीनजीकच्या हातखंबा येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:39 IST

गॅस गळती झाल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एलपीजी वाहून नेणारा टँकर भरवस्तीत उलटल्याने मोठी खळबळ उडाली. महामार्गावरील वाहतूक १५ तास पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. गॅस दुसऱ्या टँकरमध्ये काढून अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरू झाली. तोपर्यंत दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे एलपीजी भरुन हा टँकर कोल्हापूरकडे निघाला होता. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो हातखंबा येथील एका वळणावर उलटला आणि त्यातून गॅसची गळती सुरू झाली. टँकर उलटताना मोठा आवाज झाल्याने असंख्य लोक तेथे गोळा झाले. गॅसची गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने सर्वजण बाजूला झाले. दरम्यान रत्नागिरी ग्रामीण पोलिस, हातखंबा वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.सर्वात प्रथम आसपास राहणाऱ्या सुमारे १०० लोकांना महामार्गावरील एका हॉटेलमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. तोपर्यंत जिल्हा प्रशासन आणि पाेलिस प्रशासनाने गॅसची गळती रोखण्यासाठी पावले उचलली. एमआयडीसीची रेस्क्यू टीम तेथे बोलावण्यात आली. या टीमने अथक प्रयत्न करुन गॅस गळती थांबवली. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.त्यानंतर दुसरा टँकर आणून त्यात अपघातग्रस्त टँकरमधील गॅस काढून घेण्यात आला. हे दोन महत्त्वाचे टप्पे पार पडल्यानंतर अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही सर्व प्रक्रिया संपली. त्यानंतर सव्वादोन वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरू करण्यात आली. तोपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवून हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले होते.