शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

शहरातील कचरा समस्या बनलीय डोकेदुखी

By admin | Updated: June 19, 2015 00:23 IST

रत्नागिरी पालिका : पालिकेच्या सभा गाजवूनही समस्या ‘जैसे थे’च

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील कचऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून, अद्याप ही समस्या सोडविण्यात पालिकेला यश आलेले नाही. एकीकडे साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत, तर शहरातील कचराही वेळच्या वेळी उचलला जात नसल्याच्या प्रश्नावरून पंधरा दिवसांपूर्वीच्या सभेत नगराध्यक्षांना सर्वच सदस्यांनी घेरूनही शहरातील कचऱ्याची समस्या सुटलेली नाही. अनेक ठिकाणी घंटागाडीच जात नसल्याच्या तसेच कचरा आठ-आठ दिवस उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. रत्नागिरी शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असताना शहरात ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता आहे, त्यामध्ये शहर स्वच्छतेला महत्त्वाचे स्थान आहे. शहरात दररोज २२ टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे संकलन करून तो साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकला जातो. ढीग जसे वाढत जातात तसे त्या ढीगांना आग लावून देण्याचे प्रकार सुरू होतात. मात्र, आग लावल्याने कचऱ्याचे ढीग काही कमी झालेले नाहीत. त्यातच घनकचरा प्रकल्पाचा विषय रखडला असल्याने कचऱ्याचे काय करावे, असा प्रश्न पालिका प्रशासनासमोरही आहे. पालिकेतील कारभारीही त्याबाबत आपली हतबलता दाखवित आहेत. परंतु ही हतबलता नागरिक अजून किती खपवून घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घनकचरा प्रकल्पाचा विषय मार्गी लागलेला नाहीच, परंतु शहरातील कचरा संकलनाबाबतही योग्य नियोजन नसल्याने शहरात अनेक ठिकाणी कचराच उचलला जात नाही, ्र्रअशी स्थिती आहे. त्यामुळे सफाई कामगार काम करतात की नाहीत, सफाई कामगार पुरेसे आहेत की नाहीत, यांसारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. कागदोपत्री पालिकेकडे ६२ कायमस्वरुपी सफाई कामगार आहेत. शंभरपेक्षा अधिक कंत्राटी सफाई कामगार आहेत. कायम कामगारांमधील केवळ १७ ते १८ कामगारच हजर असतात. त्यामुळे शहर सफाईचे काम योग्यरित्या होणार कसे, असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे. शहराचे २८ वॉर्ड असून, नवीन रचनेनुसार ७ प्रभाग करण्यात आले आहेत. शहरातील काही जवळच्या प्रभागात कचरा संकलनाचे काम होते. मात्र अन्य ठिकाणी कचराच उचलला जात नाही, अशा तक्रारी नागरिकांतून केल्या जात आहेत. नगरसेवकांनीही याच तक्रारी करूनही सफाईचे काम योग्यरित्या होत नसल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरी पालिकेत युतीची सत्ता आल्यानंतर प्रथम नगराध्यक्ष म्हणून आपण कारभार पाहताना शहरातील स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिले होते. सफाई कामगारांचे नियोजन योग्यरित्या झाले की नाही, याची आपण सकाळी ६ वाजल्यापासूनच स्वत: तपासणी करीत होतो. त्यामुळे त्यावेळी अत्यंत चांगल्या प्रकारे स्वच्छतेचे काम सुरू होते. आता सफाई कामगारांची संख्या किती व प्रत्यक्षात कामावर असतात किती, हा संशोधनाचा विषय आहे. स्वच्छतेचे काम योग्यरित्या होत नाही, हे सर्व नगरसेवकांचे म्हणणे योग्य आहे. कामात सुधारणा आवश्यक आहेत. - मिलिंद कीर, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, रत्नागिरी.