शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचा तिढा अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 4:52 PM

रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणात रत्नागिरीतील साळवी स्टॉप ते हातखंबा तिठ्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी ३० मीटर की ४५ मीटर जागा घेतली जाणार याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

ठळक मुद्देकुवारबावमध्ये पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणी- व्यापारी संघ प्रतिनिधींनी घेतली गडकरींची भेट- ३० मीटर रस्ता रुंदीकरणाबाबत आग्रह कायम

रत्नागिरी : रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणात रत्नागिरीतील साळवी स्टॉप ते हातखंबा तिठ्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी ३० मीटर की ४५ मीटर जागा घेतली जाणार याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

व्यापारी संघ प्रतिनिधींनी नवी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेतल्यानंतरही आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. सायंकाळपर्यंत कोणताही आदेश न आल्याने महामार्ग विभागाने प्रशासनाच्या मदतीने ७०० मीटर लांबीच्या कुवारबाव येथील रस्त्याची मोजणी केली. उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेऊन कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.साळवी स्टॉप ते हातखंबा या मार्गालगत अनेक बाजारपेठा आहेत. चौपदरीकरणासाठी ४५ मीटर जागा घेतल्यास या बाजारपेठा, घरे यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यामुळे ४५ ऐवजी ३० मीटर रुंदीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली होती.

या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी कुवारबाव व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील साळवी, कार्याध्यक्ष नीलेश लाड व सचिव प्रभाकर खानविलकर यांनी केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी दुपारी १.३० वाजता नवी दिल्ली येथे मंत्रालयातील श्रमशक्ती दालनात भेट घेतली.३० मीटर रस्ता रुंदीकरण करावे या मागणीचे निवेदन मंत्री गडकरी यांना यावेळी देण्यात आले. त्यांच्याशी या शिष्टमंडळाने चर्चा केली. मंत्री गडकरी यांनी याप्रकरणी अधिकाऱ्यांना तत्काळ पडताळणीचे आदेश दिल्याची माहिती व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील साळवी यांनी प्रसारमाध्यमांना दूरध्वनीवरून दिली. मात्र कोणताही आदेश न आल्याने महामार्ग विभाग व प्रशासनाकडून कुवारबाव येथील ७०० मीटर लांबीच्या रस्त्याची ४५ मीटर रुंदीकरणासाठी मोजणी पूर्ण करण्यात आली.मिऱ्या-रत्नागिरी ते हातखंबापर्यंतचा मार्ग हा मुंबई गोवा महामार्गाचा उपमार्ग असून येथे महामार्ग कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ४५ मीटर रुंदीकरणासाठी जागा घेतली गेल्यास कुवारबावसह मार्गालगतच्या सर्वच बाजारपेठा बाधित होणार आहेत. त्यामुळे ४५ ऐवजी ३० मिटर जागा घेण्यात यावी, यासाठी कुवारबाव दशक्रोशीतील जनता आग्रही आहे.

कुवारबाव व्यापारीस संघाने त्यामध्ये पुढाकार घेतला आहे. २२ फेब्रुवारीला होणारी मोजणी रोखण्यासाठी व तीव्र विरोध दर्शविण्यासाठी जेलभरोचा इशाराही देण्यात आला होता. मात्र मोजणीत कोणत्याही प्रकारे अडथळा आणला गेल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी कुवारबाव येथे स्पष्ट केले. त्यानंतर दिवसभरात कडक पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी पूर्ण करण्यात आली.कुवारबाव व्यापारी संघाला आशाकुवारबावमध्ये उड्डाणपूल उभारू नये. सध्याच्या रस्त्याचे चौपदरीकरणासाठी ३० मीटर रुंदीकरण करावे व बाजारपेठ व घरे वाचवावीत अशी कुवारबाववासियांची मागणी होती. त्यासाठीच व्यापारी संघाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांनी अनुकुलता दाखविली असून ते कुवारबाववासियांची भावना लक्षात घेऊन योग्य न्याय देतील, अशी आशा व्यापारी संघाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग