शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पावसामुळे रत्नागिरीत सार्वजनिक, खासगी मालमत्तांचे पाच कोटींचे नुकसान, दीड महिन्यांत २८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 17:18 IST

गेल्या दोन महिन्यात अनेकदा वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला आहे. या पावसामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला तर ८७ जनावरांचे बळी गेले.

रत्नागिरी  - गेल्या दोन महिन्यात अनेकदा वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला आहे. या पावसामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला तर ८७ जनावरांचे बळी गेले. ४८१ घरांची पडझड झाली तर ४४ गोठ्यांचे नुकसान झाले. २७ सार्वजनिक मालमत्ता तर २१ खासगी मालमत्तांचे मिळून सुमारे पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.यावर्षी जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरूवात झाली. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरू झालेला पाऊस सलग चार दिवस कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे भरली. २ जुलै रोजी कोसळलेल्या पावसाने तिवरे धरण कोसळून त्यात २३ जणांचे बळी गेले. पुन्हा पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे यावर्षी पाऊस सरासरी पूर्ण करेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार बरसण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यात अनेक भागात पुराचे पाणी भरल्याने अनेक घरांचे तसेच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. १ जून ते ४ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तींच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात पावसामुळे एकूण २८ व्यक्तींचे बळी गेले असून त्यापैकी पुरात वाहून गेलेल्या २२ व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रूपयांप्रमाणे एकूण ८८ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४५ कुटुंबे आणि १५२ व्यक्ती बाधित झाल्या आहेत.या कालावधीत ४८ पक्क्या व कच्च्या घरांची पूर्णत: पडझड झाली असून १२१ घरांची अंशत: पडझड झाली आहे. ३१२ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली असून ४४ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत नुकसानासाठी ३ पक्की घरे,  १३५ अंशत: कच्ची घरे तर १० गोठ्यांना नुकसानासाठी पात्र ठरली आहेत.या पावसात ३४ मोठी दुधाळ जनावरे, ४० लहान दुधाळ जनावरे तर १३ ओढकाम करणाºया मोठ्या जनावरांचा बळी घेतला आहे. त्यापैकी आत्तापर्यंत सहा जनावरांच्या मालकांना मदत देण्यात आली आहे. या कालावधीत २७ सार्वजनिक मालमत्तेचे एकूण ४ कोटी ४५ लाख ९८ हजार ८०० रूपयांचे तर २१ खासगी मालमत्तांचे एकूण २३ लाख ५ हजार २३० असे एकूण ४ कोटी ६९ लाख ४ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.गेल्या दोन महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे जिल्ह्यात पाच कोटीे रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्याशिवाय भातशेतीचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून त्यांचे पंचनामे अजून सुरू आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस