शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

पावसामुळे रत्नागिरीत सार्वजनिक, खासगी मालमत्तांचे पाच कोटींचे नुकसान, दीड महिन्यांत २८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 17:18 IST

गेल्या दोन महिन्यात अनेकदा वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला आहे. या पावसामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला तर ८७ जनावरांचे बळी गेले.

रत्नागिरी  - गेल्या दोन महिन्यात अनेकदा वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला आहे. या पावसामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला तर ८७ जनावरांचे बळी गेले. ४८१ घरांची पडझड झाली तर ४४ गोठ्यांचे नुकसान झाले. २७ सार्वजनिक मालमत्ता तर २१ खासगी मालमत्तांचे मिळून सुमारे पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.यावर्षी जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरूवात झाली. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरू झालेला पाऊस सलग चार दिवस कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे भरली. २ जुलै रोजी कोसळलेल्या पावसाने तिवरे धरण कोसळून त्यात २३ जणांचे बळी गेले. पुन्हा पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे यावर्षी पाऊस सरासरी पूर्ण करेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार बरसण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यात अनेक भागात पुराचे पाणी भरल्याने अनेक घरांचे तसेच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. १ जून ते ४ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तींच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात पावसामुळे एकूण २८ व्यक्तींचे बळी गेले असून त्यापैकी पुरात वाहून गेलेल्या २२ व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रूपयांप्रमाणे एकूण ८८ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४५ कुटुंबे आणि १५२ व्यक्ती बाधित झाल्या आहेत.या कालावधीत ४८ पक्क्या व कच्च्या घरांची पूर्णत: पडझड झाली असून १२१ घरांची अंशत: पडझड झाली आहे. ३१२ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली असून ४४ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत नुकसानासाठी ३ पक्की घरे,  १३५ अंशत: कच्ची घरे तर १० गोठ्यांना नुकसानासाठी पात्र ठरली आहेत.या पावसात ३४ मोठी दुधाळ जनावरे, ४० लहान दुधाळ जनावरे तर १३ ओढकाम करणाºया मोठ्या जनावरांचा बळी घेतला आहे. त्यापैकी आत्तापर्यंत सहा जनावरांच्या मालकांना मदत देण्यात आली आहे. या कालावधीत २७ सार्वजनिक मालमत्तेचे एकूण ४ कोटी ४५ लाख ९८ हजार ८०० रूपयांचे तर २१ खासगी मालमत्तांचे एकूण २३ लाख ५ हजार २३० असे एकूण ४ कोटी ६९ लाख ४ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.गेल्या दोन महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे जिल्ह्यात पाच कोटीे रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्याशिवाय भातशेतीचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून त्यांचे पंचनामे अजून सुरू आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस