शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याचा आराखडा अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 17:39 IST

शिवाजी गोरेदापोली : टंचाईमुक्त महाराष्ट्र' घोषणा करून सर्वांसाठी पाणी देण्याच्या उद्देशाने युतीच्या सरकारने राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या अभियानाअंतर्गत दोन वर्षात अतिशय चांगली कामे होण्यास मदत झाली. मात्र, अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याचा आराखडा अद्याप तयार झाला नसून, आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु कामासाठी केवळ चार महिन्यांचा ...

ठळक मुद्देविविध कारणांमुळे जलयुक्त शिवारच्या तिसरा टप्पा खडतर कामासाठी केवळ चार महिन्यांचा कालावधीच शिल्लक जलसंपदा खात्याच्या २४ नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत जलसंपदामंत्री कामाचा आढावा घेणार

शिवाजी गोरेदापोली : टंचाईमुक्त महाराष्ट्र' घोषणा करून सर्वांसाठी पाणी देण्याच्या उद्देशाने युतीच्या सरकारने राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या अभियानाअंतर्गत दोन वर्षात अतिशय चांगली कामे होण्यास मदत झाली. मात्र, अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याचा आराखडा अद्याप तयार झाला नसून, आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु कामासाठी केवळ चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने जलयुक्त शिवारच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रवास खडतर होण्याची चिन्ह आहेत.

जलयुक्त शिवार अभियान मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची निवड करून त्या गावातील पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील सन २०१५-१६मध्ये निवड झालेली कामे पूर्ण झाली आहेत.

दुसऱ्या वर्षी २०१६-१७ या वर्षाची कामे अंतिम टप्प्यात असून, त्यातील १० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तिसऱ्या वर्षी म्हणजे २०१७-१८ या वर्षाचा आराखडा तयार करून या प्रारुप आराखड्याला मंजुरी देऊन कामाचे बजेट ठरविणे गरजेचे आहे. परंतु तिसऱ्या टप्प्यातील गावांची यादी तयार व्हायला विलंब झाल्याने तिसऱ्या टप्प्यातील आराखडा अद्याप तयार झालेला नाही.

आराखडा मंजूर झाल्यावर अनुदानपत्र व कामाची वर्क आॅर्डर या सगळ्या प्रक्रियेला डिसेंबर महिना जाईल. त्यानंतर प्रत्यक्षात काम करण्यासाठी केवळ ४ ते ५ महिने शिल्लक राहतात. या कालावधीत तिसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण होणे शक्य नाही.

कालावधी कमी असल्यामुळे घाईगडबडीत कामे केल्यास ती निकृष्ट होण्याची शक्यता असते. यापूर्वीच कृषी विभाग दृष्टचक्राच्या फेऱ्यात अडकला असून, निकृष्ट दर्जाची कामे झाल्यास कृषी विभागाच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी वरिष्ठ पातळीवरून यापूर्वीच दखल घेण्याची गरज होती.

जलयुक्त शिवार अभियानातील गावांची निवड होण्यासाठी विलंब लागला असल्याने पुढील कामाला विलंब होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवातीला ७२ गावांची निवड करण्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर गावाची संख्या कमी करण्याचे संकेत देण्यात आले.

गावाच्या निवडीवरूनही काही ठिकाणी राजकारण झाल्यामुळे गावांच्या अंतिम यादीला अंतिम स्वरुप देण्यात आले नाही. या विविध कारणांमुळे जलयुक्त शिवारच्या तिसऱ्या टप्प्यातील गावांची निवड होऊ शकली नसल्याचे वृत्त आहे.पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी कृती आराखडा तयार केला. या कृती आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावातील कामे केली जातात. परंतु गावांची यादीच निश्चित झाली नसल्याने कृती आराखडा रखडला आहे.

जलसंपदा खात्याची २४ नोव्हेंबर रोजी बैठक होत आहे. राज्याचे जलसंपदामंत्री  प्रा. राम शिंदे या बैठकीत जलयुक्त शिवारच्या कामाचा आढावा घेणार आहेत.

मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी आराखडा तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून, येत्या दोन दिवसात तिसऱ्या टप्प्यातील अंतिम यादी व आराखडा तयार केला जाणार असून, मंत्र्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRam Shindeप्रा. राम शिंदे