शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:32 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी पंतप्रधान ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. गेली दोन वर्षे पूर, वादळ यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा योजनेमुळे आर्थिक हातभार मिळू लागला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली होती. याचा लाभ एकूण ३६५१ शेतकऱ्यांनी घेतला आहे.

भात व नागली पिकासाठी विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प होती. दोन वर्षापूर्वी कापणी केलेले भात पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्याचे उंबरठा उत्पन्न ७० टक्के पेक्षा अधिक आहे. ५० टक्के पेक्षा उत्पन्न कमी असल्याचा निकष विमा योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येत असल्याने उंबरठा उत्पन्नामुळे जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत होते; मात्र गेल्या दोन वर्षात पूर, चक्रीवादळ यामुळे पिकांचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी जागृत झाले असून, विमा योजनेकडे कल वाढू लागला आहे. सुरुवातीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने लाभार्थींची संख्या दुपटीने वाढली आहे. ७५४.८१ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र जाहीर केले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांची संख्या दुप्पट

गतवर्षी १३०० शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते; मात्र २५० शेतकऱ्यांना १४ लाखांचा परतावा प्राप्त झाला होता.

१५ जुलैपर्यंत १७६८ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते; मात्र मुदतवाढीमुळे संख्या वाढली आहे.

भातासाठी ३५११, नागलीसाठी १४० शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये ४२२ कर्जदार व ३२२९ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

उत्पन्नाचा निकष आड

जिल्ह्याचे भाताचे उंबरठा उत्पन्न ७० टक्केपेक्षा जास्त आहे. नुकसानासाठी ५० टक्केपेक्षा कमी उत्पन्न ग्राह्य धरले जात असल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत होते.

दोन वर्षांपूर्वी कापलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात आली होती. पेरणी ते कापणीपर्यंतचे नुकसान ग्राह्य धरले जात असल्याने विमा योजनेमुळे आर्थिक हातभार लागत आहे. अटी शिथिल केल्यामुळेच प्रतिसाद वाढू लागला आहे.

- महेश चाळके, शेतकरी.

पिकाचा विमा काढून केवळ पैसे भरण्यापेक्षा जर जिल्ह्यातील नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना परतावा मिळणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील नुकसान ग्राह्य धरले जात असून, शेतकऱ्यांना परतावा प्राप्त होत आहे; मात्र निकषात सुधारणा होणे आवश्यक आहे.

- राजेश रेवाळे, शेतकरी.