शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:32 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी पंतप्रधान ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. गेली दोन वर्षे पूर, वादळ यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा योजनेमुळे आर्थिक हातभार मिळू लागला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली होती. याचा लाभ एकूण ३६५१ शेतकऱ्यांनी घेतला आहे.

भात व नागली पिकासाठी विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प होती. दोन वर्षापूर्वी कापणी केलेले भात पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्याचे उंबरठा उत्पन्न ७० टक्के पेक्षा अधिक आहे. ५० टक्के पेक्षा उत्पन्न कमी असल्याचा निकष विमा योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येत असल्याने उंबरठा उत्पन्नामुळे जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत होते; मात्र गेल्या दोन वर्षात पूर, चक्रीवादळ यामुळे पिकांचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी जागृत झाले असून, विमा योजनेकडे कल वाढू लागला आहे. सुरुवातीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने लाभार्थींची संख्या दुपटीने वाढली आहे. ७५४.८१ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र जाहीर केले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांची संख्या दुप्पट

गतवर्षी १३०० शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते; मात्र २५० शेतकऱ्यांना १४ लाखांचा परतावा प्राप्त झाला होता.

१५ जुलैपर्यंत १७६८ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते; मात्र मुदतवाढीमुळे संख्या वाढली आहे.

भातासाठी ३५११, नागलीसाठी १४० शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये ४२२ कर्जदार व ३२२९ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

उत्पन्नाचा निकष आड

जिल्ह्याचे भाताचे उंबरठा उत्पन्न ७० टक्केपेक्षा जास्त आहे. नुकसानासाठी ५० टक्केपेक्षा कमी उत्पन्न ग्राह्य धरले जात असल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत होते.

दोन वर्षांपूर्वी कापलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात आली होती. पेरणी ते कापणीपर्यंतचे नुकसान ग्राह्य धरले जात असल्याने विमा योजनेमुळे आर्थिक हातभार लागत आहे. अटी शिथिल केल्यामुळेच प्रतिसाद वाढू लागला आहे.

- महेश चाळके, शेतकरी.

पिकाचा विमा काढून केवळ पैसे भरण्यापेक्षा जर जिल्ह्यातील नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना परतावा मिळणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील नुकसान ग्राह्य धरले जात असून, शेतकऱ्यांना परतावा प्राप्त होत आहे; मात्र निकषात सुधारणा होणे आवश्यक आहे.

- राजेश रेवाळे, शेतकरी.