शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कोकणात रुजलाय जगातील सर्वात महाग काळा तांदूळ, अभिषेक सुर्वे याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 1:49 PM

Agriculture Sector, konkan, rice, farmar, ratnagirinews, कोकणात भातशेती व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर नसल्याचा दावा केला असला तरी त्यात वेगवेगळे प्रयोग झाले तर शेतकरी आणि पर्यायाने कोकणाचा आर्थिक विकास होऊ शकतो, हे दापोलीच्या अभिषेक सुर्वे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. जगात सर्वात महागड्या व शरीराला उपयुक्त असल्यामुळे औषध कंपन्यांकडूनही मागणी असलेल्या काळ्या तांदळाची शेती त्याने दापोलीत केली आहे.

ठळक मुद्देदापोलीतील करंजाळी येथे काळ्या तांदळाच्या शेतीचा प्रयोग यशस्वीकोकणाची अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता

दापोली : कोकणात भातशेती व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर नसल्याचा दावा केला असला तरी त्यात वेगवेगळे प्रयोग झाले तर शेतकरी आणि पर्यायाने कोकणाचा आर्थिक विकास होऊ शकतो, हे दापोलीच्या अभिषेक सुर्वे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. जगात सर्वात महागड्या व शरीराला उपयुक्त असल्यामुळे औषध कंपन्यांकडूनही मागणी असलेल्या काळ्या तांदळाची शेती त्याने दापोलीत केली आहे.दापोली तालुक्यातील करंजाळी येथील अभिषेक सुर्वे या सव्वीस वर्षांच्या तरूणाने हा आदर्श उभा केला आहे. अभिषेक हा दापोली तालुक्यातील करंजाळी येथील मूळ रहिवासी असला तरी तो मुंबई येथे अभियंता म्हणून नोकरीला होता. नोकरीचा राजीनामा देऊन तो आता दापोलीत आला आहे.

येथे अन्य काही करण्यापेक्षा त्याने शेतीला प्राधान्य दिले आणि वडिलोपार्जित शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरू केले. तो मुंबईतील एका धान्य उत्पादन व वितरण व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी आहे. यामध्ये त्याला सर्वप्रथम काळ्या तांदळाची माहिती मिळाली.

लॉकडाऊन काळात पत्रव्यवहार करून त्याने काळ्या तांदळाचे बियाणे टपालाने मागवले. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे हे बियाणे मिळायला तीन महिन्यांचा अवधी लागला. यामुळे यातील अर्धेअधिक बियाणे खराब होऊन गेले. उरलेले बियाणे अभिषेकने जमिनीत पेरले. आज अभिषेकच्या दारात काळ्या तांदळाची भातशेती चांगली तरारली आहे.या काळ्या तांदळाला मोठ्या शहरांबरोबर परदेशातही मोठी मागणी आहे. मोठ्या शहरांमध्ये हा काळा तांदूळ किमान चारशे ते पाचशे रुपये किलो दराने विकला जातो. फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन साईटवर या तांदळाची विक्री ३९९ रुपये दराने सुरू असल्याची माहिती यावेळी अभिषेक दिली.काळा तांदूळ हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहेच. शिवाय त्याला आरोग्याच्यादृष्टीनेही महत्त्व आहे. कार्बोहायड्रेटयुक्त असलेला हा काळा तांदूळ शरीरातील साखर व हृदयरोग असलेल्या रुग्णांना उपयुक्त आहे. काळ्या तांदळाच्या भातामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. त्यात मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने हे पचण्यास उपयुक्त असतात. सोबतच अँटी ऑक्सिडेंट तत्व असल्याने हे डोळ्यांसाठीही उपयुक्त ठरतात. स्वास्थ्यासाठी लाभदायक असल्याने औषध कंपन्यांकडूनही त्याला मोठी मागणी आहे.१५० दिवसात तयारदेशात काळ्या तांदळाच्या वेगवेगळ्या चार ते पाच जातींचे उत्पादन केले जाते. १५० दिवसांमध्ये हा काळा तांदूळ तयार होतो. काळा तांदूळ हा असा एकमेव तांदूळ आहे त्यापासून बिस्किटे तयार केली जातात. शिवाय शरीर स्वस्त व मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो, अशी माहिती अभिषेक सुर्वे यांनी दिली.शेतकऱ्यांना फायदेशीरकोकणामध्ये भातशेती ही तुकड्या - तुकड्यात विखुरली आहे. कोकणामध्ये भात शेतीसाठीच्या अल्प जागेमध्ये तेवढ्यातच श्रमामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांना दहा पट अधिक नफा देणारे हे बियाणे आहे. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतीतील काही भागात पुढील वषार्पासून काळ्या तांदळाची शेती केल्यास ते कोकणाला वरदान ठरेल, असा विश्वास अभिषेक सुर्वे यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी