शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मुंबई-गोवा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार, वृद्ध दाम्पत्य बालंबाल बचावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:20 IST

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-कोकजेवठार (ता. रत्नागिरी ) येथे कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. गाडीतून धूर ...

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-कोकजेवठार (ता. रत्नागिरी) येथे कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात येताच गाडीतील वृद्ध दाम्पत्याला बाहेर काढल्याने माेठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत कार पूर्ण जळून २५ हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.याबाबत विश्वनाथ गंगाराम पवार (७४, रा. हुनमाननगर, विलेपार्ले, मुंबई) यांनी पाेलिस स्थानकात माहिती दिली. त्यानुसार, रविवारी ते पत्नी वंदना पवार आणि आपल्या चालकासह कार (एमएच ०२, व्हीटी ४६३३) मधून मुंबई ते ओणी असा प्रवास करत होते. दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ते महामार्गावरील निवळी-कोकजेवठार येथे आले असता, त्यांच्या कारमधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने पवार दाम्पत्याला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला.ही बाब आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलिस, अग्निशमन दल आणि हातखंबा वाहतूक पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच घटनास्थळी दाखल हाेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कार रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेडकाॅन्स्टेबल रुपेश भिसे करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआगhighwayमहामार्ग