शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मुंबई-गोवा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार, वृद्ध दाम्पत्य बालंबाल बचावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:20 IST

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-कोकजेवठार (ता. रत्नागिरी ) येथे कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. गाडीतून धूर ...

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-कोकजेवठार (ता. रत्नागिरी) येथे कारने अचानक पेट घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात येताच गाडीतील वृद्ध दाम्पत्याला बाहेर काढल्याने माेठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत कार पूर्ण जळून २५ हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.याबाबत विश्वनाथ गंगाराम पवार (७४, रा. हुनमाननगर, विलेपार्ले, मुंबई) यांनी पाेलिस स्थानकात माहिती दिली. त्यानुसार, रविवारी ते पत्नी वंदना पवार आणि आपल्या चालकासह कार (एमएच ०२, व्हीटी ४६३३) मधून मुंबई ते ओणी असा प्रवास करत होते. दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ते महामार्गावरील निवळी-कोकजेवठार येथे आले असता, त्यांच्या कारमधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने पवार दाम्पत्याला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला.ही बाब आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलिस, अग्निशमन दल आणि हातखंबा वाहतूक पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच घटनास्थळी दाखल हाेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कार रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेडकाॅन्स्टेबल रुपेश भिसे करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआगhighwayमहामार्ग