शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रप्रमुखांच्या मागण्यांसाठी २८ रोजी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:37 IST

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुखांच्या न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरी जिल्हा शाखा ...

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुखांच्या न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरी जिल्हा शाखा २८ सप्टेंबर, २०१२ रोजी रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करणार आहे. या धरणे आंदोलनाचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.

केंद्रप्रमुखांच्या मागण्यांमध्ये केंद्रप्रमुखांना तांत्रिक सेवेत समाविष्ट करणे, वर्ग-२ ची पदोन्नती मिळणे, सेवानिवृत्तीच्या वेळी रजेच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाचा लाभ मिळणे, अभावित केंद्रप्रमुखांना कायम करणे, कायमस्वरूपी प्रवास भत्त्यात सुधारणा करणे, केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागा भरणे, केंद्रप्रमुखपदी पदोन्नती झाल्यामुळे अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या या बाबींमध्ये वाढ झाल्यामुळे केंद्रप्रमुखांना पदोन्नतीची एक वेतन वाढ देणे, केंद्रशाळांची पुनर्रचना करणे, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचा एक प्रतिनिधी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर सदस्य म्हणून घेणे, सध्या केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागांमुळे जादा केंद्राचा प्रभार असणाऱ्या केंद्रप्रमुखांना अतिरिक्त प्रभाराचे वेतन मिळणे, केंद्रप्रमुखांमधून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन केंद्रप्रमुखांना गुणवंत केंद्रप्रमख पुरस्काराने गौरविणे आदींचा समावेश आहे.

या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनाही सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के, सचिव सुनील जाधव, राज्य मुख्य संघटक विष्णुपंत पवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.