शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात दुग्ध व्यवसायाला हवी ऊर्जितावस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST

आजही दुधाचे दर कमी असून, सोसायटींमध्ये सरासरी २५ रुपये लीटर दर हा गायीच्या दुधाला मिळत आहे. पॅकेटबंद दूध ४४ ...

आजही दुधाचे दर कमी असून, सोसायटींमध्ये सरासरी २५ रुपये लीटर दर हा गायीच्या दुधाला मिळत आहे. पॅकेटबंद दूध ४४ ते ४६ रुपये प्रति लीटर दराने विकले जाते. तर काही फार्मस् त्यांच्या दुधाची विक्री थेट ग्राहकांना करतात. त्यासाठी ५५ ते ७० रुपये प्रति लीटर इतका दर आकारला जातो. यासाठी विविध ब्रॅंड व मार्केटिंगचे तंत्र वापरले जाते. यामध्ये देशी गायीचे दूध, फार्म फ्रेश दूध, निर्जंतुक, मनुष्याचा हात न लागलेले दूध, प्रतिजैविकेविरहीत दूध, ओमेगा फॅटयुक्त दूध यामुळे ग्राहकाला विविध प्रकारच्या दुधांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे दूध व दुधापासून बनवलेल्या पदार्थांची आपण कशी विक्री करू शकतो, यावर आपल्या व्यवसायाच्या नफ्याचे गणित ठरते. स्वच्छ व निर्जंतुक दुधाला यापुढे मागणी वाढेल, अशास्थितीत कोकणाला ‘सुदृढ’ बनवणारा लाखो लीटर क्षमतेचा वाशिष्ठी डेअरी प्रकल्प चिपळुणात कार्यरत होत असल्याने तो एक दुग्धशर्करा योग मानला जात आहे. दूध प्रकल्प चिपळुणात सुरु होणे ही फार महत्त्वाची बाब आहे. हा प्रकल्प खासगी तत्त्वावर असला तरी त्याचे संचालन सहकारी पद्धतीने असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख, चिपळूण, खेड तालुक्यांत सहकारी तत्त्वावरचे छोट्या व मध्यम स्वरुपाच्या दूध प्रकल्पांचे प्रयत्न झाले, पण आपल्या कोकणी वृत्तीने त्याचा घातच केला. प्रकल्पाचे भवितव्य हे संकलन होणाऱ्या दुधावर आणि बाय प्रॉडक्टवर असते. शेतकऱ्यांनी स्वतःसाठी व प्रकल्पासाठी प्रामाणिकपणे दूध देण्याचे काम केले तर कोकण अशा प्रकल्पांवर सुफलाम् होण्यास वेळ लागणार नाही. प्रारंभी काळात ३० हजार लीटर दूध संकलन लक्ष्य असलेल्या या दूध प्रकल्पाची कमाल मर्यादा दीड लाख लीटर आहे. कोकणासाठी ही एक मोठी ‘संधी’ आहे. हा कृषी प्रकल्प यशस्वी झाला, तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत हाेण्यास मदत हाेणार आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला दुग्ध व्यवसायाशी निगडीत २२३ दुग्ध संस्थांपैकी केवळ ५८ संस्था सुरु आहेत. तब्बल १६५ दुग्ध संस्था बंद आहेत. शासनाकडून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आवश्यक तेवढे प्रयत्न न झाल्याने जिल्ह्याचा एकूणच दुग्ध व्यवसाय मरणावस्थेत आहे. मात्र, आता या व्यवसायाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने प्रयत्न करायला हवेत.

- संदीप बांद्रे