शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

मिसळीतून कांदा गायब, कांदाभजीचा पत्ता कट

By admin | Updated: July 9, 2014 23:45 IST

पुन्हा कांदा संकट : व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी...

रत्नागिरी : कांद्याचे दर वधारले आहेत. सध्या ३० ते ३५ रूपये किलो दराने कांदा विक्री सुरू आहे. भविष्यात दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिसळीतील कांदा गायब झाला आहे, तर टपऱ्यांवरील कांदाभजीचा पत्ताच कट झाला आहे.कांदा वधारल्यामुळे उपाहारगृह व टपरी व्यावसायिकांना कांदा सढळ हस्ते देणे परवडत नाही. कांदा भविष्यात वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी कांद्याने १०० रूपये किलोपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर ते खाली आले होते. सहा ते सात रूपये दराने कांद्याची विक्री सुरू होती. परंतु पावसाअभावी कांद्याचे दर वधारले तसेच ते आणखी वधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उपाहारगृह चालकांनी मिसळीतून कांदा देणे बंद केले आहे. काही उपाहारगृहांतून मिसळीत थोडासा कांदा दिला जातो. परंतु कांदाभजी मात्र बंद करण्यात आली आहे. कांदा ७ ते ८ रूपये किलो दराने विकण्यात येत होता. त्यावेळी कांदाभजी १५ रूपयांना ५ नग देण्यात येत होते. मात्र, ३० ते ३५ रूपये दर असल्याने दर वाढविला तर सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारा नसल्यामुळे कांदाभजी काढणे बंद करण्यात आली आहे.मूग किंवा वाटाण्याच्या गरमागरम रशात सढळ हस्ते कांदा, फरसाण, कोथिंबीर, कांदेपोहे, शेव घातली जाते. वरून पुन्हा एकदा कडकडीत रस्सा ओतला जातो. कांद्याचा दर वाढल्याने सढळ हस्ते कांदा देणे परवडत नाही. त्यामुळे बहुतांश उपाहारगृहातून मिसळीत थोडासा कांदा दिला जातो, तर टपरी व्यावसायिकांनी तो देणेच बंद केले आहे. शिवाय पुन्हा कुठल्या ग्राहकांनी कांदा मागविला तर त्यांना चक्क नकार दिला जातो. बहुतांश हॉटेल्समध्ये कांद्याऐवजी चिरलेला कोबी दिला जातो.टपरीवर येणारा ग्राहक सर्वसाधारण गटातील असतो. त्यामुळे कांदाभजीचे दर वाढविणे परवडणारे नाही. त्यामुळे कांदाभजी तयार करणे बंद करण्यात आले आहे. शिवाय पावसाळ्यात घरोघरी भजीचा सुगंध दरवळतो. मात्र, यावर्षी महागाईमुळे कांद्याऐवजी चक्क कोबीची भजी करून पानात वाढून घेतली जात आहे.यावर्षी कांदा, बटाट्याचे दर वाढले आहेत. अजून दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे साठा केलेला कांदा जपून वापरण्यात येत आहे. कांदाभजी प्लेटमध्ये १५ रूपयास ५ नग देणे परवडत नाही. प्लेटचे दर वाढविले तर मात्र ते ग्राहकांस परवडणारे नाहीत. त्यामुळे एकूण अंदाज घेत कांदाभजीची विक्री बंद करण्यात आली आहे. मिसळीत नावाला कांदा घालण्यात येत आहे. बटाटाभजी, बटाटावडा, मिक्स भजी, मिरची भजी सध्या विक्रीस उपलब्ध आहेत.- के.एस. कांबळे, व्यावसायिक, रत्नागिरी (प्रतिनिधी)