शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पिहिली प्रतिक्रिया 
3
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
4
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
5
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
6
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
7
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
8
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
9
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
10
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
11
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
12
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
13
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
14
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
15
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
16
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
17
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
18
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
19
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
20
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus in ratnagiri- आमच्या गावात कोणीही येऊ नका... जिल्ह्याच्या सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 17:45 IST

गावातील जनतेला कोरोनाचा धोका कळला असल्याने आता रत्नागिरी शहरातील मांडवी, कारवांचीवाडी - धनावडे वाडी, वरवडे आदी गावांनी आपल्या सीमा इतरांसाठी बंद केल्या आहेत. जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे - परशुराम आणि राजापूर तालुक्यातील पाचल गावानेही गावात बंदी घातली आहे.

ठळक मुद्देआमच्या गावात कोणीही येऊ नका... जिल्ह्याच्या सीमा बंदजिल्ह्यात पाच गावे स्वत:हून झाली क्वॉरंटाईन,गावात येण्यास मनाई

रत्नागिरी : गावातील जनतेला कोरोनाचा धोका कळला असल्याने आता रत्नागिरी शहरातील मांडवी, कारवांचीवाडी - धनावडे वाडी, वरवडे आदी गावांनी आपल्या सीमा इतरांसाठी बंद केल्या आहेत. जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे - परशुराम आणि राजापूर तालुक्यातील पाचल गावानेही गावात बंदी घातली आहे.

कोरोना संसर्गावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाकडून संशयितांना सेल्फ क्वॉरंटाईन किंवा होम क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. यासाठी जमावबंदी, संचारबंदी करावी लागत आहे. तरीही शहरातील लोकांना त्याचे गांभीर्य वाटत नाही. मात्र, गावांनी आपल्या सीमा इतरांसाठी बंद केल्या आहेत.सध्या देशात कोरोनाने भयावह रूप धारण केले आहे. मुंबई - पुण्यासह आता रत्नागिरीतही कोरोनाचा रूग्ण सापडला असून, त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. देशातील अनेक लोक परदेशात राहतात. कोरोनाच्या भीतीने हे लोक मोठ्या प्रमाणावर देशात परतू लागले आहेत, तर काही आधीच आले आहेत.

परदेशातून आलेल्या लोकांकडूनच मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देशात परतलेल्या व्यक्तीची मोठ्या प्रमाणावर तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. देशात संसर्ग वाढू नये, यासाठी आलेल्या लोकांनाही खबरदारीचा उपाय म्हणून क्वॉरंटाईनमध्ये ठेवले जात आहे.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही कडक पावले उचलली आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशाने जिल्ह्यात जमावबंदी, जनता कर्फ्यू, लॉक डाऊन आणि अखेर संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीही शहरातील नागरिक कोरोनाचा धोका तितकासा गांभीर्याने घेत नसल्यानेच पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे.

संचारबंदी असूनही नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य आणि पोलीस यंत्रणेसह इतर यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. मात्र, नागरिक यापासून अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.सुशिक्षित म्हणवणाऱ्या शहरी भागात ही स्थिती असली तरी ग्रामीण जनता मात्र, वेळीच सावध झाली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आता या गावांना आपले विलगीकरण आपणच करण्याची गरज वाटत आहे.

त्यामुळे रत्नागिरीतील मांडवी तसेच तालुक्यातील पोमेंडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या कारवांची वाडी - धनावडेवाडी आणि वरवडे या गावांनी ह्यसेल्फ क्वॉरंटाईनह्ण पाळत आपल्या गावामध्ये येणाऱ्यांना आणि बाहेर जाणाऱ्यांनाही बंदी केली आहे.या गावांनी बांबू किंवा दगड टाकून आपल्या गावची सीमा बंद केली आहे. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय वाडीत प्रवेश करू नये, अशा सूचनांचे फलकही लावले आहेत. आपल्या गावात किंवा वाडीत कुणालाच येऊ द्यायचे नाही, याबरोबरच आपल्या गावातीलही कुणाला बाहेर जाऊ द्यायचे नाही, अशी ठाम भूमिका या गावांनी घेतली आहे.

या गावांनी आता कोरोनाचा संसर्ग होऊ न देण्यासाठी स्वत:च खबरदारीची उपाययोजना करीत आपल्या गावातील प्रत्येकाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी