शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

corona in ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यात पुणे, मुंबईतून आलेल्यांना घरातच राहण्याचे सक्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 7:31 PM

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुंबई व पुणे शहरातून ८ मार्च २०२० नंतर आलेल्या व्यक्तींनी घरातच राहण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशीत केले आहे.

ठळक मुद्देघरातून बाहेर पडल्यास होणार कारवाई, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनामुंबई, पुणे येथे कोरोना बाधितांची संख्या अधिक

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये मुंबई व पुणे शहरातून ८ मार्च २०२० नंतर आलेल्या व्यक्तींनी घरातच राहण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशीत केले आहे.शासनाने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३,४ मधील तरतूदीनुसार अधिसूचना काढण्यात आली आहे. सद्यस्थितीत संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात बहुतांश भागात, रत्नागिरी जिल्ह्यासह कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव विषाणूबाधीत रुग्णांच्या संपर्कात आल्यास संसर्गाने होतो. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांपासून व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींपासून दुसऱ्या व्यक्तींना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामधील लोकांना एकत्रीत येण्यापासून प्रतिबंध करणे आवश्यक आहे.मुंबई व पुणे यासारख्या मोठ्या शहरात कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड-१९) संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई व पुणे शहरातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात रत्नागिरी जिल्ह्यातील नागरीक आल्यास त्यामुळे स्थानिक नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुंबई व पुणे शहरातून ८ मार्च २०२० नंतर आलेल्या व्यक्तींना राहत्या ठिकाणातून/घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आले आहे.आदेशाचे भंग करणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ४३ व कलम ५६ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० खाली दंडनीय कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी