शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Ratnagiri: कोकण ग्रामीण विकास पर्यटन निधीवरून महायुतीत वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:54 IST

दापोली : तालुक्यातील कर्दे गावासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमात मंजूर १४ कोटी रुपयांवरून शिंदेसेना आणि भाजप या दोन ...

दापोली : तालुक्यातील कर्दे गावासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमात मंजूर १४ कोटी रुपयांवरून शिंदेसेना आणि भाजप या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. एका शासन अध्यादेशाचा आधार घेत भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी एकाच गावात अधिक निधी खर्च केला जात असल्याचा आक्षेप घेतला आहे. मात्र, जुन्या अध्यादेशाच्या आधारावर ते बोलत असून, नव्या अध्यादेशानुसार ते आपल्याच पक्षाच्या मंत्र्याच्या कामावर आक्षेप घेत आहेत, असा पलटवार राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला आहे.राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमात एकाच ठेकेदाराला दिलेल्या कामावर डॉ. नातू यांनी बोट ठेवले आहे. या योजनेच्या अध्यादेशाप्रमाणे पाच ते सहा गावांचा एक गट याप्रमाणे ३ ते ५ कोटी या मर्यादेपर्यंत कामांना मंजुरी देणे अपेक्षित आहे. मात्र, दापोली तालुक्यातील एकाच गावामध्ये १४ कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. कंत्राटदाराच्या भल्यासाठी ही कामे होत असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला असून, याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.त्यांच्या या आरोपावर राज्यमंत्री कदम यांनी पलटवार केला आहे. डॉ. नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार  करताना  ज्या अध्यादेशाचा उल्लेख  केला आहे, तो २०१५ या सालातील आहे. त्यात ग्रामविकास राज्यमंत्री अध्यक्ष  असा उल्लेख आहे. परंतु २०२०च्या सुधारित अध्यादेशानुसार ग्रामविकास मंत्री अध्यक्ष आहेत. त्यामुळे नातू आपल्याच मंत्र्याच्या कामावर आक्षेप घेत आहेत, असे राज्यमंत्री कदम यांनी म्हटले आहे.ही योजना अनेक वर्षे रखडली होती. निधी खर्च होत नव्हता. आपण त्यासाठी पुढाकार घेतला. एकाचवेळी जास्त गावे घेतली तर कोणाच्याही वाट्याला पुरेशी रक्कम येणार नाही. त्यापेक्षा एक एक गाव विकसित करण्यावर आपला भर असल्याचे ते म्हणाले.निधीचा गैरवापर नाही

  • मंजूर झालेल्या १४ कोटी निधीचा कुठेही दुरुपयोग होणार नाही. मात्र, आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्याअगोदर नातू यांनी आपल्याशी संवाद साधला असता तर विषय वाढला नसता.
  • पहिल्यांदाच समुद्रकिनाऱ्यावरील  अनेक गाव विकसित करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यात नातू यांनी आडकाठी घालू नये, असा विनंतीवजा इशारा कदम यांनी दिला आहे.