शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

Ratnagiri: कोकण ग्रामीण विकास पर्यटन निधीवरून महायुतीत वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:54 IST

दापोली : तालुक्यातील कर्दे गावासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमात मंजूर १४ कोटी रुपयांवरून शिंदेसेना आणि भाजप या दोन ...

दापोली : तालुक्यातील कर्दे गावासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमात मंजूर १४ कोटी रुपयांवरून शिंदेसेना आणि भाजप या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. एका शासन अध्यादेशाचा आधार घेत भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी एकाच गावात अधिक निधी खर्च केला जात असल्याचा आक्षेप घेतला आहे. मात्र, जुन्या अध्यादेशाच्या आधारावर ते बोलत असून, नव्या अध्यादेशानुसार ते आपल्याच पक्षाच्या मंत्र्याच्या कामावर आक्षेप घेत आहेत, असा पलटवार राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला आहे.राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमात एकाच ठेकेदाराला दिलेल्या कामावर डॉ. नातू यांनी बोट ठेवले आहे. या योजनेच्या अध्यादेशाप्रमाणे पाच ते सहा गावांचा एक गट याप्रमाणे ३ ते ५ कोटी या मर्यादेपर्यंत कामांना मंजुरी देणे अपेक्षित आहे. मात्र, दापोली तालुक्यातील एकाच गावामध्ये १४ कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. कंत्राटदाराच्या भल्यासाठी ही कामे होत असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला असून, याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.त्यांच्या या आरोपावर राज्यमंत्री कदम यांनी पलटवार केला आहे. डॉ. नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार  करताना  ज्या अध्यादेशाचा उल्लेख  केला आहे, तो २०१५ या सालातील आहे. त्यात ग्रामविकास राज्यमंत्री अध्यक्ष  असा उल्लेख आहे. परंतु २०२०च्या सुधारित अध्यादेशानुसार ग्रामविकास मंत्री अध्यक्ष आहेत. त्यामुळे नातू आपल्याच मंत्र्याच्या कामावर आक्षेप घेत आहेत, असे राज्यमंत्री कदम यांनी म्हटले आहे.ही योजना अनेक वर्षे रखडली होती. निधी खर्च होत नव्हता. आपण त्यासाठी पुढाकार घेतला. एकाचवेळी जास्त गावे घेतली तर कोणाच्याही वाट्याला पुरेशी रक्कम येणार नाही. त्यापेक्षा एक एक गाव विकसित करण्यावर आपला भर असल्याचे ते म्हणाले.निधीचा गैरवापर नाही

  • मंजूर झालेल्या १४ कोटी निधीचा कुठेही दुरुपयोग होणार नाही. मात्र, आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्याअगोदर नातू यांनी आपल्याशी संवाद साधला असता तर विषय वाढला नसता.
  • पहिल्यांदाच समुद्रकिनाऱ्यावरील  अनेक गाव विकसित करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यात नातू यांनी आडकाठी घालू नये, असा विनंतीवजा इशारा कदम यांनी दिला आहे.