शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

विजय महायुतीचाच, पण कोणाचा ते गुलदस्त्यात-- प्रसाद लाड यांची गुगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:17 IST

राज्यात महायुती आहे म्हणता, तर कणकवली मतदारसंघात भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर सेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत कसे काय रिंगणात आहेत. अन्यत्र बंडखोरी शमविली, मग कणकवलीत

ठळक मुद्देमूळ प्रश्नाला बगल देत दिले उत्तर

रत्नागिरी : राज्यभर महायुती आहे, कणकवलीतही महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राज्यात महायुती आहे म्हणता, तर कणकवली मतदारसंघात भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर सेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत कसे काय रिंगणात आहेत. अन्यत्र बंडखोरी शमविली, मग कणकवलीत सेनेच्या उमेदवाराने माघार का घेतली नाही, या प्रश्नाला बगल देत नेमका कोण निवडून येणार हे सांगणे टाळले.भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या प्रदेशकडून आधी मंजूर करून घेतल्या आहेत. त्या नियुक्त्या योग्यच आहेत, असे स्पष्ट करीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांची पाठराखण केली आहे. पदनियुक्तीवरून जिल्हाध्यक्ष पटवर्धन व माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यात जोरदार वादंग झाले होते. याबाबत विचारता लाड बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष सुशांत चवंडे व पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी लाड म्हणाले, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने गेल्या पाच वर्षात विकासाची जी कामे केली आहेत, त्यामुळे हे सरकार पुन्हा सत्तेवर येणार हा विश्वास आहे. सरकारवर आरोप करणे हे विरोधकांचे कामच आहे. विरोधकांमध्ये आता जान उरलेली नाही. ते हतबल झाले आहेत. राष्ट्रावादीतील नेत्यांनी साथ सोडल्यानेच राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या वयातही प्रचारासाठी जावे लागतेय. कॉँग्रेसही हतबल झाली आहे. त्यामुळे २१ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३५पेक्षा अधिक जागा मिळतील व पुन्हा सत्ता येईल, असा दावा लाड यांनी केला.नाणार प्रकल्पाचा पुनर्विचारनाणार पुन्हा आणणार असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर व रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी केले होते. शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध असताना नाणार कसा काय आणला जाणार, असा सवाल करण्यात आला. त्यावर लाड म्हणाले, नाणार प्रकल्प व्हावा, अशी स्थानिकांचीच मागणी आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचा पुनर्विचार होणार आहे. स्थानिकांना विकास हवा आहे. निवडणुकीनंतर उच्चस्तरीय समितीमार्फत नाणारबाबतची भूमिका पुन्हा ऐकून घेतली जाणार आहे. 

टॅग्स :Prasad Ladप्रसाद लाडRatnagiriरत्नागिरीBJPभाजपा