शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
2
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
3
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
4
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
5
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
6
चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ?
7
मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, नाराज अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्र. ११४ मधून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 
8
'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
10
"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
11
वैमानिकांची पळवापळवी! जॉइनिंगसाठी थेट ५० लाखांची ऑफर; इंडिगो आणि एअर इंडियामध्ये चुरस
12
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
13
“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित
14
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
15
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
16
VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL
17
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
18
एचआयव्ही पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला दिलासा; नोकरी कायम करण्याचे हायकाेर्टाने दिले निर्देश
19
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
20
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

विजय महायुतीचाच, पण कोणाचा ते गुलदस्त्यात-- प्रसाद लाड यांची गुगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:17 IST

राज्यात महायुती आहे म्हणता, तर कणकवली मतदारसंघात भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर सेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत कसे काय रिंगणात आहेत. अन्यत्र बंडखोरी शमविली, मग कणकवलीत

ठळक मुद्देमूळ प्रश्नाला बगल देत दिले उत्तर

रत्नागिरी : राज्यभर महायुती आहे, कणकवलीतही महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राज्यात महायुती आहे म्हणता, तर कणकवली मतदारसंघात भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर सेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत कसे काय रिंगणात आहेत. अन्यत्र बंडखोरी शमविली, मग कणकवलीत सेनेच्या उमेदवाराने माघार का घेतली नाही, या प्रश्नाला बगल देत नेमका कोण निवडून येणार हे सांगणे टाळले.भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या प्रदेशकडून आधी मंजूर करून घेतल्या आहेत. त्या नियुक्त्या योग्यच आहेत, असे स्पष्ट करीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांची पाठराखण केली आहे. पदनियुक्तीवरून जिल्हाध्यक्ष पटवर्धन व माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यात जोरदार वादंग झाले होते. याबाबत विचारता लाड बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष सुशांत चवंडे व पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी लाड म्हणाले, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने गेल्या पाच वर्षात विकासाची जी कामे केली आहेत, त्यामुळे हे सरकार पुन्हा सत्तेवर येणार हा विश्वास आहे. सरकारवर आरोप करणे हे विरोधकांचे कामच आहे. विरोधकांमध्ये आता जान उरलेली नाही. ते हतबल झाले आहेत. राष्ट्रावादीतील नेत्यांनी साथ सोडल्यानेच राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या वयातही प्रचारासाठी जावे लागतेय. कॉँग्रेसही हतबल झाली आहे. त्यामुळे २१ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३५पेक्षा अधिक जागा मिळतील व पुन्हा सत्ता येईल, असा दावा लाड यांनी केला.नाणार प्रकल्पाचा पुनर्विचारनाणार पुन्हा आणणार असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर व रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी केले होते. शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध असताना नाणार कसा काय आणला जाणार, असा सवाल करण्यात आला. त्यावर लाड म्हणाले, नाणार प्रकल्प व्हावा, अशी स्थानिकांचीच मागणी आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचा पुनर्विचार होणार आहे. स्थानिकांना विकास हवा आहे. निवडणुकीनंतर उच्चस्तरीय समितीमार्फत नाणारबाबतची भूमिका पुन्हा ऐकून घेतली जाणार आहे. 

टॅग्स :Prasad Ladप्रसाद लाडRatnagiriरत्नागिरीBJPभाजपा