शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

रत्नागिरी : सुनील तटकरे यांचे दापोलीत सुतोवाच, रायगडमध्ये परिवर्तन निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 13:46 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात असणारी परिस्थिती कमालीची बदलली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व समविचारी पक्षांची आघाडी यंदा रायगड मतदारसंघात परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केला. दापोलीतील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्देरायगडमध्ये परिवर्तन निश्चित सुनील तटकरे यांचे दापोलीत सुतोवाच

दापोली : गेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात असणारी परिस्थिती कमालीची बदलली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व समविचारी पक्षांची आघाडी यंदा रायगड मतदारसंघात परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केला. दापोलीतील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी ते पुढे म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला अत्यल्प मतांनी पराभव स्वीकाराला लागला होता. हा फरक यावेळी आपण लिलया भरून काढू. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी देशात मोदींची लाट होती. ती आता पूर्णपणे ओरसली आहे. विरोधक सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याने त्यांनी जनतेची तेव्हाची सहानुभूती गमावली आहे.विरोधकांच्या फसव्या राजकारणाला आता जनता कंटाळली आहे. यामुळे आगामी निवडणुकांसाठी गेल्यावेळेपेक्षा अगदी विरूध्द वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे यंदा रायगड लोकसभा मतदारसंघात निश्चितपणे परिवर्तन होणार असल्याचे सांगितले.गेल्यावेळी या मतदार संघातून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी आपली निष्क्रीयता दाखवून रायगडमधील मतदारांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे आता जनता मतदानाच्या दिवसाची वाट पाहत आहे. यावळी मतदार कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाची आपल्याला भक्कम साथ मिळाली आहे.

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार, हे निश्चित असल्याने आत्तापासूनच विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात परिवर्तन निश्चित असून, येथे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, असे तटकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसRatnagiriरत्नागिरीRaigadरायगड