शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

रत्नागिरीत उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 5:00 PM

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोनामुळे सामाजिक अंतर राखत पूर्ण क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, रविवार, २० सप्टेंबरपासून महामंडळाकडून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून शहरी मार्गावरील वाहतूकही सुरू करण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार बसेस सोमवारपासून शहरी वाहतूक सुरू, प्रवाशांना दिलासा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोनामुळे सामाजिक अंतर राखत पूर्ण क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, रविवार, २० सप्टेंबरपासून महामंडळाकडून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून शहरी मार्गावरील वाहतूकही सुरू करण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे.कोरोनामुळे दिनांक २२ मार्चपासून एस्. टी.ची वाहतूक ठप्प होती. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार २० ऑगस्टपासून सामाजिक अंतर राखून आसन क्षमतेच्या ५० टक्केप्रमाणे आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याला राज्य परिवहन महामंडळाला परवानगी देण्यात आली. त्यानुसार टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली.

कर्नाटक व गुजरात राज्यांनी शंभर टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातही शंभर टक्के प्रवासी वाहतुकीला प्रारंभ होणार आहे. एस्. टी. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क व सॅनिटायझर लावणे बंधनकारक आहे.वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बस या निर्जंतूक करूनच मार्गस्थ करण्यात याव्यात, लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या झेड पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे. मात्र, यापुढे पूर्ण आसन क्षमतेने वाहतुकीला परवानगी देण्यात आल्याने सर्व आसने पूर्ववत करण्याची सूचना देण्यात आली आहे. रत्नागिरी विभागातर्फे रविवार, २० सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.रत्नागिरीतील शहरी वाहतूक दिनांक २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. लॉकडाऊनपासून आतापर्यंत शहरी वाहतूक बंद होती. आता शहरी वाहतूक सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीRatnagiriरत्नागिरी