शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

बोअरवेलचे पाणी थांबता थांबेना, जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा, लोकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 13:22 IST

Water Chiplun Ratnagiri-एका बाजूला तीव्र उष्म्यामुळे पाणीटंचाई होत चाललेली असताना चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे खोदलेल्या बोअरवेलमधून पाणी थांबता थांबत नाही, असे अनोखे दृश्य पाहायला मिळत आहे. जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा येत असल्याने तो पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करू लागले आहेत.

ठळक मुद्देजमिनीतून पाण्याचा मोठा फवारा पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी

असुर्डे /चिपळूण : एका बाजूला तीव्र उष्म्यामुळे पाणीटंचाई होत चाललेली असताना चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे खोदलेल्या बोअरवेलमधून पाणी थांबता थांबत नाही, असे अनोखे दृश्य पाहायला मिळत आहे. जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा येत असल्याने तो पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करू लागले आहेत.हिंदू धर्म शास्त्रानुसार जलाची पूजा केली जाते. लाखो रुपये खर्च करूनही ते मिळत नाही. सध्याच्या दिवसात तर चांगले चांगले स्रोत आटून जातात. परंतु कोकरे येथील संजय व मनोज पर्शराम दळवी यांच्या बादी येथील शेत जमिनीने मात्र कमालच केली आहे.

तेथे खोदलेल्या बोअरवेलच्या पाण्याचा ओघ काही केल्या थांबत नाही. या शेत जमिनीत झाडांची लागवड केली आहे. ती अतितीव्र उष्णतेमुळे सुकून जात होती. यासाठी या भावांनी बोअरवेल पाडण्याचा निर्णय घेतला. अखेर मंगळवारी रात्री २० फुटापर्यंत बुरूम माती तर १५० फुटापर्यंत कातळ लागला.त्यानंतर १७० फुटापर्यंत बोअरवेलचे खोदकाम करण्यात करून ७ इंच पाईप टाकण्यात आला. परंतु रात्री ११ वाजल्यापासून अद्याप ७ इंच पाईप सातत्याने ओसंडून वाहत आहे. हे पाणी बाहेर जाऊ नये. म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु सर्व उपाय व्यर्थ ठरले आहेत. हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी अनेकजण येत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात भूजल पातळी खाली जाते. परंतु इथे मात्र पाणी भरभरून वाहत आहे.

लोकांना जमिनीतील पाणी वर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतात. परंतु इथे मात्र हा स्रोत आता थांबविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी भूगर्भतज्ज्ञांनाही बोलावले जाणार आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे हे पाणी गरम आहे. त्यामुळे हे गंधकाचे पाणी आहे, असा अनेक जण दावा करीत आहे. काही जणांनी पाण्याची चव घेतली असता सर्वसाधारण पिण्याच्या पाण्याची चव आहे.बोअरवेलच्या पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की जवळच असलेल्या नदीत हा प्रवाह जात असल्यामुळे सुकलेल्यानदीत पाणीच पाणी दिसत आहे. यामुळे भुगर्भातील जलाशयाची पातळी, आजूबाजूच्या पाण्याचे स्रोत यांचा अभ्यास करण्याची गरज आहे.

टॅग्स :WaterपाणीChiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरी