शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

Ratnagiri: समुद्रकिनाऱ्यावर दोन ठिकाणी आढळले मृतदेह, दापोलीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:09 IST

ओळख पटविण्याचे काम सुरू

दापोली : तालुक्यातील केळशी आणि आंजर्ले अशा दोन समुद्रकिनारी बुधवारी दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन्ही मृतदेह समुद्रातून वाहून आले आहेत. मात्र त्यांची ओळख पटलेली नाही.बुधवारी सकाळच्या सुमारास केळशी समुद्रकिनारी ग्रामस्थांना मृतदेह आढळला. याबाबतची माहिती पोलिस पाटलांनी तत्काळ पोलिसांना दिली. पोलिस त्याचा पंचनामा करत असतानाच आंजर्ले येथे आणखी एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन मृतदेह सापडल्यामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.दोघेही समुद्रातूनच वाहून आले असल्याने त्यांची ओळख सांगणारी काहीही कागदपत्रे पोलिसांना मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. आसपासच्या कोणत्याही भागात मच्छीमार किंवा स्थानिक ग्रामस्थ बेपत्ता असल्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे या व्यक्ती स्थानिक नसाव्यात, असा प्राथमिक अंदाज आहे. आता नजीकच्या तालुक्यात तसेच रायगड जिल्ह्यातही याबाबत माहिती घेतली जाणार आहे. पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मृतदेहापाशी बॅगयातील एका मृतदेहानजीक बॅग (स्कूल बॅगसारखी सॅक) आढळली आहे. त्यात काय होते, याची माहिती अजून उघड करण्यात आलेली नाही. दोन्ही मृतदेह भरतीच्या पाण्यासोबत वाहून आले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मच्छीमार असण्याची शक्यतागेले दोन दिवस वादळसदृश वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यावेळी मासेमारी करत असलेल्या एखाद्या बोटीतील हे दोन खलाशी असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही मृत व्यक्तींचा चेहरा पाण्यात राहिल्यामुळे सुजला आहे. दापोली पोलिसांनी रत्नागिरी जिल्हा मुख्यालयासह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे मुंबई, पालघर अशा सर्व ठिकाणच्या पोलिसांना संदेश पाठवला आहे. त्यातून या दोघांची ओळख पटेल, अशी अपेक्षा आहे.