शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

Ratnagiri: समुद्रकिनाऱ्यावर दोन ठिकाणी आढळले मृतदेह, दापोलीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:09 IST

ओळख पटविण्याचे काम सुरू

दापोली : तालुक्यातील केळशी आणि आंजर्ले अशा दोन समुद्रकिनारी बुधवारी दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन्ही मृतदेह समुद्रातून वाहून आले आहेत. मात्र त्यांची ओळख पटलेली नाही.बुधवारी सकाळच्या सुमारास केळशी समुद्रकिनारी ग्रामस्थांना मृतदेह आढळला. याबाबतची माहिती पोलिस पाटलांनी तत्काळ पोलिसांना दिली. पोलिस त्याचा पंचनामा करत असतानाच आंजर्ले येथे आणखी एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन मृतदेह सापडल्यामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.दोघेही समुद्रातूनच वाहून आले असल्याने त्यांची ओळख सांगणारी काहीही कागदपत्रे पोलिसांना मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. आसपासच्या कोणत्याही भागात मच्छीमार किंवा स्थानिक ग्रामस्थ बेपत्ता असल्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे या व्यक्ती स्थानिक नसाव्यात, असा प्राथमिक अंदाज आहे. आता नजीकच्या तालुक्यात तसेच रायगड जिल्ह्यातही याबाबत माहिती घेतली जाणार आहे. पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मृतदेहापाशी बॅगयातील एका मृतदेहानजीक बॅग (स्कूल बॅगसारखी सॅक) आढळली आहे. त्यात काय होते, याची माहिती अजून उघड करण्यात आलेली नाही. दोन्ही मृतदेह भरतीच्या पाण्यासोबत वाहून आले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मच्छीमार असण्याची शक्यतागेले दोन दिवस वादळसदृश वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यावेळी मासेमारी करत असलेल्या एखाद्या बोटीतील हे दोन खलाशी असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही मृत व्यक्तींचा चेहरा पाण्यात राहिल्यामुळे सुजला आहे. दापोली पोलिसांनी रत्नागिरी जिल्हा मुख्यालयासह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे मुंबई, पालघर अशा सर्व ठिकाणच्या पोलिसांना संदेश पाठवला आहे. त्यातून या दोघांची ओळख पटेल, अशी अपेक्षा आहे.