शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

सेनेच्या धनुष्याला रत्नागिरीत भाजपचा बाण? विधानसभेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:08 IST

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना जिल्ह्यात शिवसेना व भाजप या दोन मित्र पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. युती म्हणून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या गुहागर, रत्नागिरी व देवगड या विधानसभा मतदारसंघांवर भाजप आपला हक्क सांगणार असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देसेनेच्या धनुष्याला रत्नागिरीत भाजपचा बाण? विधानसभेची तयारीजिल्ह्यात सेना-भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण, युतीबाबत संभ्रमच

रत्नागिरी : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना जिल्ह्यात शिवसेना व भाजप या दोन मित्र पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. युती म्हणून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या गुहागर, रत्नागिरी व देवगड या विधानसभा मतदारसंघांवर भाजप आपला हक्क सांगणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास शिवसेनेला दुसऱ्या मतदार संघांचा विचार करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अन्यथा भाजपच्या परंपरागत मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची वेळही शिवसेनेवर येऊ शकते. तशी निवडणूक रणनीती भाजपअंतर्गत आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी दापोली - खेड, चिपळूण व राजापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ युतीच्या पूर्वीच्या जागा वाटपानुसार शिवसेनच्या हक्काचे आहेत. मात्र, मध्यंतरी युती नसताना रत्नागिरी, गुहागर व देवगड या मतदारसंघातून सेना व भाजपचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत आमने-सामने उभे ठाकले होते. अलिकडच्या लोकसभा निवडणुकीत सेना व भाजपची निवडणूकपूर्व युती झाली, तर गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेमध्ये सेना-भाजपने पॅचअप केले.येत्या तीन महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्याची अधिसूचना प्रसिध्द व्हावयाची आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपच्या परंपरागत रत्नागिरी, गुहागर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड विधानसभा मतदारसंघांवर भाजप हक्क सांगणार काय, अशी चर्चा सुरू झाली होती व त्यात तथ्य आहे.दोन महिन्यांपूर्वीच रत्नागिरीत भाजप व संबंधित सर्व सहकारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यावेळीही या मतदारसंघांवर भाजपने आपला हक्क सांगावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. युती झाली नाही तर पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर स्वतंत्र लढतील. पण युती झाली तर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे अधिक आहेत.गुहागर परंपरागतगुहागर मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. गुहागर हा मतदारसंघ परंपरागत भाजपचा आहे. तेथून अनेकवेळा विनय नातू हे विजयी झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघावरील आपला हक्क भाजप सोडणार नाही. परंतु जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी केवळ याच मतदारसंघावरील हक्क सांगण्याबाबत आग्रही दिसून येत आहेत. मात्र, रत्नागिरी व देवगडवरही हक्क सांगणार, असे म्हणणारे भाजपचे पदाधिकारी त्याबाबत गुहागरप्रमाणे आग्रही भूमिका घेत नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.रत्नागिरीबाबत उत्सुकतारत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत यांनी पहिल्या दोनवेळा राष्ट्रवादीतर्फे, तर तिसऱ्यावेळी सेनेतून विजय मिळवला आहे. हा मतदारसंघ सुरुवातीला भाजपच्या वाट्याला आला होता. आता सेनेने या मतदारसंघात वर्चस्व निर्माण केले आहे. हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा, असा आग्रह आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबत उत्सुकता आहे. रत्नागिरीऐवजी सेनेला जिल्ह्याबाहेरचा मतदारसंघ द्यावा किंवा जिल्ह्यातील सेनेचा मतदारसंघ रत्नागिरीच्या मोबदल्यात भाजपला मिळावा, असे पर्यायही सुचविले जात आहेत.रत्नागिरीच्या बदल्यात चिपळूण !जिल्ह्यातील चिपळूण व दापोली मतदारसंघात भाजपचे बळ आता वाढले असल्याचे भाजपअंतर्गत मत आहे. चिपळूण नगर परिषदेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही मतदारसंघांवर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दावा करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. रत्नागिरी सेनेला सोडावयाचा असेल तर चिपळूण किंवा दापोली मतदारसंघ सेनेने भाजपला सोडावा, अशी मागणीही होत आहे. त्यामुळे जागांवरून तेढ निर्माण होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी