शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

सेनेच्या धनुष्याला रत्नागिरीत भाजपचा बाण? विधानसभेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:08 IST

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना जिल्ह्यात शिवसेना व भाजप या दोन मित्र पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. युती म्हणून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या गुहागर, रत्नागिरी व देवगड या विधानसभा मतदारसंघांवर भाजप आपला हक्क सांगणार असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देसेनेच्या धनुष्याला रत्नागिरीत भाजपचा बाण? विधानसभेची तयारीजिल्ह्यात सेना-भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण, युतीबाबत संभ्रमच

रत्नागिरी : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना जिल्ह्यात शिवसेना व भाजप या दोन मित्र पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. युती म्हणून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या गुहागर, रत्नागिरी व देवगड या विधानसभा मतदारसंघांवर भाजप आपला हक्क सांगणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास शिवसेनेला दुसऱ्या मतदार संघांचा विचार करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अन्यथा भाजपच्या परंपरागत मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची वेळही शिवसेनेवर येऊ शकते. तशी निवडणूक रणनीती भाजपअंतर्गत आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी दापोली - खेड, चिपळूण व राजापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ युतीच्या पूर्वीच्या जागा वाटपानुसार शिवसेनच्या हक्काचे आहेत. मात्र, मध्यंतरी युती नसताना रत्नागिरी, गुहागर व देवगड या मतदारसंघातून सेना व भाजपचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत आमने-सामने उभे ठाकले होते. अलिकडच्या लोकसभा निवडणुकीत सेना व भाजपची निवडणूकपूर्व युती झाली, तर गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेमध्ये सेना-भाजपने पॅचअप केले.येत्या तीन महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्याची अधिसूचना प्रसिध्द व्हावयाची आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपच्या परंपरागत रत्नागिरी, गुहागर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड विधानसभा मतदारसंघांवर भाजप हक्क सांगणार काय, अशी चर्चा सुरू झाली होती व त्यात तथ्य आहे.दोन महिन्यांपूर्वीच रत्नागिरीत भाजप व संबंधित सर्व सहकारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यावेळीही या मतदारसंघांवर भाजपने आपला हक्क सांगावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. युती झाली नाही तर पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर स्वतंत्र लढतील. पण युती झाली तर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे अधिक आहेत.गुहागर परंपरागतगुहागर मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. गुहागर हा मतदारसंघ परंपरागत भाजपचा आहे. तेथून अनेकवेळा विनय नातू हे विजयी झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघावरील आपला हक्क भाजप सोडणार नाही. परंतु जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी केवळ याच मतदारसंघावरील हक्क सांगण्याबाबत आग्रही दिसून येत आहेत. मात्र, रत्नागिरी व देवगडवरही हक्क सांगणार, असे म्हणणारे भाजपचे पदाधिकारी त्याबाबत गुहागरप्रमाणे आग्रही भूमिका घेत नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.रत्नागिरीबाबत उत्सुकतारत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत यांनी पहिल्या दोनवेळा राष्ट्रवादीतर्फे, तर तिसऱ्यावेळी सेनेतून विजय मिळवला आहे. हा मतदारसंघ सुरुवातीला भाजपच्या वाट्याला आला होता. आता सेनेने या मतदारसंघात वर्चस्व निर्माण केले आहे. हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा, असा आग्रह आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबत उत्सुकता आहे. रत्नागिरीऐवजी सेनेला जिल्ह्याबाहेरचा मतदारसंघ द्यावा किंवा जिल्ह्यातील सेनेचा मतदारसंघ रत्नागिरीच्या मोबदल्यात भाजपला मिळावा, असे पर्यायही सुचविले जात आहेत.रत्नागिरीच्या बदल्यात चिपळूण !जिल्ह्यातील चिपळूण व दापोली मतदारसंघात भाजपचे बळ आता वाढले असल्याचे भाजपअंतर्गत मत आहे. चिपळूण नगर परिषदेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही मतदारसंघांवर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दावा करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. रत्नागिरी सेनेला सोडावयाचा असेल तर चिपळूण किंवा दापोली मतदारसंघ सेनेने भाजपला सोडावा, अशी मागणीही होत आहे. त्यामुळे जागांवरून तेढ निर्माण होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी