शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

सेनेच्या धनुष्याला रत्नागिरीत भाजपचा बाण? विधानसभेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:08 IST

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना जिल्ह्यात शिवसेना व भाजप या दोन मित्र पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. युती म्हणून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या गुहागर, रत्नागिरी व देवगड या विधानसभा मतदारसंघांवर भाजप आपला हक्क सांगणार असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देसेनेच्या धनुष्याला रत्नागिरीत भाजपचा बाण? विधानसभेची तयारीजिल्ह्यात सेना-भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण, युतीबाबत संभ्रमच

रत्नागिरी : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना जिल्ह्यात शिवसेना व भाजप या दोन मित्र पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. युती म्हणून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या गुहागर, रत्नागिरी व देवगड या विधानसभा मतदारसंघांवर भाजप आपला हक्क सांगणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास शिवसेनेला दुसऱ्या मतदार संघांचा विचार करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अन्यथा भाजपच्या परंपरागत मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची वेळही शिवसेनेवर येऊ शकते. तशी निवडणूक रणनीती भाजपअंतर्गत आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी दापोली - खेड, चिपळूण व राजापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ युतीच्या पूर्वीच्या जागा वाटपानुसार शिवसेनच्या हक्काचे आहेत. मात्र, मध्यंतरी युती नसताना रत्नागिरी, गुहागर व देवगड या मतदारसंघातून सेना व भाजपचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत आमने-सामने उभे ठाकले होते. अलिकडच्या लोकसभा निवडणुकीत सेना व भाजपची निवडणूकपूर्व युती झाली, तर गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेमध्ये सेना-भाजपने पॅचअप केले.येत्या तीन महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्याची अधिसूचना प्रसिध्द व्हावयाची आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपच्या परंपरागत रत्नागिरी, गुहागर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड विधानसभा मतदारसंघांवर भाजप हक्क सांगणार काय, अशी चर्चा सुरू झाली होती व त्यात तथ्य आहे.दोन महिन्यांपूर्वीच रत्नागिरीत भाजप व संबंधित सर्व सहकारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यावेळीही या मतदारसंघांवर भाजपने आपला हक्क सांगावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. युती झाली नाही तर पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर स्वतंत्र लढतील. पण युती झाली तर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे अधिक आहेत.गुहागर परंपरागतगुहागर मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. गुहागर हा मतदारसंघ परंपरागत भाजपचा आहे. तेथून अनेकवेळा विनय नातू हे विजयी झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघावरील आपला हक्क भाजप सोडणार नाही. परंतु जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी केवळ याच मतदारसंघावरील हक्क सांगण्याबाबत आग्रही दिसून येत आहेत. मात्र, रत्नागिरी व देवगडवरही हक्क सांगणार, असे म्हणणारे भाजपचे पदाधिकारी त्याबाबत गुहागरप्रमाणे आग्रही भूमिका घेत नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.रत्नागिरीबाबत उत्सुकतारत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत यांनी पहिल्या दोनवेळा राष्ट्रवादीतर्फे, तर तिसऱ्यावेळी सेनेतून विजय मिळवला आहे. हा मतदारसंघ सुरुवातीला भाजपच्या वाट्याला आला होता. आता सेनेने या मतदारसंघात वर्चस्व निर्माण केले आहे. हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा, असा आग्रह आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबत उत्सुकता आहे. रत्नागिरीऐवजी सेनेला जिल्ह्याबाहेरचा मतदारसंघ द्यावा किंवा जिल्ह्यातील सेनेचा मतदारसंघ रत्नागिरीच्या मोबदल्यात भाजपला मिळावा, असे पर्यायही सुचविले जात आहेत.रत्नागिरीच्या बदल्यात चिपळूण !जिल्ह्यातील चिपळूण व दापोली मतदारसंघात भाजपचे बळ आता वाढले असल्याचे भाजपअंतर्गत मत आहे. चिपळूण नगर परिषदेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही मतदारसंघांवर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दावा करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. रत्नागिरी सेनेला सोडावयाचा असेल तर चिपळूण किंवा दापोली मतदारसंघ सेनेने भाजपला सोडावा, अशी मागणीही होत आहे. त्यामुळे जागांवरून तेढ निर्माण होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी