शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला आता जिल्ह्यात मतदार संघच नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:52 IST

भाजपसाठी शिल्लक राहिलेला एकमेव गुहागर मतदारसंघही आता विद्यमान आमदार म्हणून सेनेच्या गळ्यात पडण्याची शक्यता असल्याने भाजपला जिल्ह्यात उमेदवारीसाठी विधानसभा मतदारसंघच शिल्लक राहणार नाही.

ठळक मुद्देभाजपला आता जिल्ह्यात मतदार संघच नाही ?एकमेव गुहागरही जाणार, राजकीय समीकरणे बदलली

रत्नागिरी : राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केल्यामुळे युतीमधील जिल्ह्यातील जागा वाटपाचा विषय अजूनच गुंतागुंतीचा होणार आहे. तीन मतदार संघात मुळातच शिवसेनेचे आमदार आहेत.

भाजपसाठी शिल्लक राहिलेला एकमेव गुहागर मतदारसंघही आता विद्यमान आमदार म्हणून सेनेच्या गळ्यात पडण्याची शक्यता असल्याने भाजपला जिल्ह्यात उमेदवारीसाठी विधानसभा मतदारसंघच शिल्लक राहणार नाही.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होईलच, असे राज्यस्तरावरील नेते ठामपणे सांगत आहेत. युती झाली तर युतीतील भाजपला रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघच उरणार नाही, असे चित्र आता दिसू लागले आहे.

जिल्ह्यात सध्या राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण हे तीन मतदार संघ शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या जागावाटपात हे तीनही मतदार संघ त्यांच्याकडेच राहतील, हे निश्चित आहे. उर्वरित दापोली आणि गुहागर या दोन मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

सन २०१४च्या निवडणुकीत युती झाली नव्हती. तेव्हा दापोलीमध्ये शिवसेना आणि गुहागरमध्ये भाजपकडे दुसऱ्या क्रमांकाची मते होती. जागा वाटपाच्या पद्धतीनुसार दुसऱ्या क्रमांकाची मते असलेल्या पक्षाला तेथील उमेदवारी दिली जाते. मात्र, आता गुहागर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी दिली तर गुहागरमधून लढण्याची इच्छाही भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे विद्यमान आमदाराला पुन्हा उमेदवारी देण्याचा निकष लावला गेला तर गुहागर मतदार संघ भाजपच्या हातून निसटण्याची शक्यता आहे.

दापोली मतदारसंघात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपले सुपुत्र योगेश कदम यांच्यासाठी गेली तीन वर्षे जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यादृष्टीने त्यांचा प्रचारही सुरू आहे. त्यामुळे शिवसेना हा मतदारसंघ सोडणार नाही, हेही निश्चित आहे.

भाजपने गुहागर मतदार संघासाठी ठाम मागणी केली असली तरी विद्यमान आमदार ज्या पक्षाचा, त्या पक्षाला तेथील उमेदवारी देण्याची प्रथा असल्याने गुहागर मतदारसंघ सेनेकडे जाण्याची शक्यता आहे. त्याऐवजी राज्यातील अन्य एखादा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपला दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र, तसे झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला मतदार संघच शिल्लक राहणार नाही.

ही शक्यता लक्षात घेऊन भाजपचे गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांनी लगेचच सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या मतदार संघाची मागणी केली आहे. त्यामुळे सेना आणि भाजपमध्ये या जागेवरून वितुष्ट येण्याची शक्यता आहे.

सेनेमागून फरपट

जिल्हा परिषद, नगर परिषदा अशा ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेशी युती आहे, अशा सर्वच ठिकाणी भाजपला दुय्यम वागणूक देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला सत्तेत भागिदार करण्याची शिवसेनेची इच्छा नाही. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या मागून फरपटत जात आहे. विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे, अशी प्रतिक्रिया एका भाजप पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.

कार्यकर्ते स्वीकारतील?

गुहागरची जागा शिवसेनेला दिली गेली तर भाजप कार्यकर्ते हा निर्णय स्वीकारतील का, हा मुख्य प्रश्न आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपला शिवसेनेपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी या जागेसाठी दावाकेला आहे. जागा वाटप करताना या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डावलून ही जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय घेणे धोक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी