शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भाईंदरच्या बेपत्ता सोने व्यावसायिकाचा रत्नागिरीत खून, तिघांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 16:49 IST

आर्थिक व्यवहारातून रत्नागिरीतील सुवर्णकार भूषण खेडेकर याने आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने हा खून केले असल्याचे तपासात पुढे आले

रत्नागिरी : रत्नागिरीत बेपत्ता झालेल्या ठाण्यातील सोने व्यावसायिक कीर्तीकुमार अजयराज कोठारी यांचा मृतदेह सापडला आणि त्याचा गळा आवळून खून झाला असल्याचे स्पष्ट झाले. आर्थिक व्यवहारातून रत्नागिरीतील सुवर्णकार भूषण खेडेकर याने आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने हा खून केले असल्याचे तपासात पुढे आले आणि पोलिसांनी भूषण खेडेकर व अन्य दोघांना बेड्या ठोकल्या. भूषणने हत्या केल्याची कबुली पोलिसांना देत आपणच मध्यरात्री कोठारी यांचा मृतदेह आबलोलीनजीकच्या नदीत फेकल्याचे पोलिसांना सांगितले आहे.अटक केलेल्या तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मृतदेह घेऊन जाण्यासाठी वापरलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. एका व्यापाऱ्यानेच व्यापाऱ्याचा खून केल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भूषण सुभाष खेडेकर (४२ रा. खालची आळी), महेश मंगलप्रसाद चौगुले (३९, रा. मांडवी, रिक्षाचालक), फरीद महामुद होडेकर (३६, रा. भाट्ये , खोतवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.सोने विक्रीसाठी रत्नागिरी बाजारपेठेत आलेले ठाणे भाईंदर येथील सोने व्यापारी कीर्तीकुमार कोठारी सोमवारी बेपत्ता झाले. मंगळवारी त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांचा मुलगा करण बुधवारी रत्नागिरीत दाखल झाला. त्याने आपले वडील बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी संशयित म्हणून तिघांना ताब्यात घेतले आणि या प्रकरणाचा वेगाने उलगडा झाला.

दुकानात गेले; पण बाहेर नाही आले

बेपत्ता कीर्तीकुमार यांचा शोध घेताना पोलिसांनी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यावेळी कीर्तीकुमार त्रिमूर्ती ज्वेलर्समध्ये आत गेलेले दिसले. मात्र ते दुकान बंद होईपर्यंत दुकानातून बाहेरच आले नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी दुकानमालक भूषण खेडेकर यांची चौकशी केल्यानंतर त्याने दोन मित्रांच्या मदतीने हा खून केल्याचे आणि मृतदेह आबलोली येथे टाकल्याचे कबूल केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस