शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

गांधींमुळेच बहुजन मागासलेले

By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST

वामन मेश्राम : भारत मुक्ती मोर्चाचे रत्नागिरीत जिल्हा अधिवेशन

रत्नागिरी : बहुजन समाज आज मागासलेला आहे आणि याला जबाबदार महात्मा गांधी आहेत, असा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. भारत मुक्ती मोर्चा रत्नागिरी जिल्हा अधिवेशनप्रसंगी मराठा मंदिर सभागृहात ते बोलत होते.यावेळी त्यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्ह्यातील इतिहास संशोधक श्रीकांत शेट्ये, रत्नागिरी जिल्हा कोकण बँक उपाध्यक्ष बशीर मुर्तुझा उपस्थित होते. मेश्राम म्हणाले की, भारतामध्ये इंग्रज स्वातंत्र्याच्या १५० वर्षे आधी आले होते. पण त्यापूर्वी हजारो वर्षे ब्राह्मणांनी बहुजन समाजाला आपले गुलाम केले होते व नंतर इंग्रजांनी ब्राह्मणांना गुलाम केले. परिणामी बहुजन समाज गुलामांचा गुलाम बनला. स्वातंत्र्यानंतर ब्राह्मण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण बहुजन समाज आजही ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला नाही म्हणून तो आजही मागासलेला आहे, असे ते म्हणाले.मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस सरकारने नेहमीच जाती - पातीचे राजकारण केले. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी मराठा, मुस्लिम, लिंगायत व धनगर अशा आरक्षणाच्या घोषणा निवडणुकीपूर्वी केल्या व निवडणुकीनंतर हीच आरक्षणे न्यायालयामध्ये ठेवली असा आरोपही त्यांनी केला. देशात सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण सुरु करण्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी छेडला. ओबीसी जातीनिहाय मोजणी झाली तर ओबीसी संख्या किती आहे हे जनतेला माहिती होईल व सत्ता हाती ठेवण्यासाठी अडचण निर्माण होईल, असेही ते यावेळी म्हणाले. (वार्ताहर)भारत मुक्ती मोर्चातर्फे रत्नागिरीत आयोजित केलेल्या जिल्हा अधिवेशनाला जिल्हाभरातून बांधव उपस्थित होते. त्यामुळे या अधिवेशनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. अधिवेशनामध्ये बहुजन समाजासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मतांसाठी बहुजन समाजाचा वापर करणाऱ्या राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली.