शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

जिल्ह्यातील ‘सावित्रीच्या ६२६५ लेकीं’साठी दत्तक योजनेचा आधार

By admin | Updated: March 9, 2015 23:54 IST

--सावित्रीबाई फुले स्मृतिदिन

शोभना कांबळे - रत्नागिरी -पालकांच्या हलाखीच्या स्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड न पडता त्यांना सहायभूत ठरावी, या उद्देशाने महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शासनाने सुरू केलेल्या दत्तक - पालक योजनेमुळे जिल्ह्यातील सावित्रीच्या ६२६५ लेकींना शिक्षणाचा हातभार मिळत आहे.शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी शासनाने वेळोवेळी विविध योजना अमलात आणल्या आहेत. तरीही अनेक मुली, महिला शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या पालकांची हलाखीची स्थिती. हे लक्षात घेऊन मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लागावा, या उद्देशाने ज्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ निर्माण केली, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शासनाने १९८३ - ८४मध्ये ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना’ सुरू केली. यामुळे समाजातून मुलींच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी अनेक दाते पुढे येत आहेत. या मुलींना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत आहेत. पहिली ते आठवीच्या ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास, तसेच शहरातील झोपडपट्टीतील गरजू मुलींना अनुसूचित जाती, जमाती, भटक्या आणि विमुक्त जातीतील मुलींचा या योजनेसाठी प्राधान्याने विचार केला जातो. आतापर्यंत या योजनेंतर्गत २ कोटी २० लाख ९६,००० एवढा निधी मुदत ठेव स्वरूपात जमा आहे. या मुदत ठेव स्वरूपात जमा झालेल्या रकमेतून दरमहा ३० रूपयेप्रमाणे दहा महिन्यांकरिता ३०० एवढी शैक्षणिक आर्थिक मदत दिली जाते.ग्रामीण भागातील तसेच गरजू मुलींना शैक्षणिक सुविधा मिळणे कठीण असल्याने त्यांच्या पालकांना नाईलाजाने त्यांचे शिक्षण थांबवावे लागत होते. मात्र, आता त्यांना आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी शासनाने ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना’ सुरू केल्याने आज सावित्रीच्या हजारो लेकी सन्मानाने शिकत आहेत. या योजनेमुळे आर्थिक सहाय्याचा हात पुढे करणाऱ्या समाजातील अनेक व्यक्तींमुळे गरजू मुलींना शिक्षण सोपे झाले आहे. जिल्ह्यात २०१४ - १५ या कालावधीत या योजनेचा लाभ पहिली ते आठवीतील एकूण ६२६५ गरजू विद्यार्थिनीना मिळाला. सर्वाधिक लाभ खेड तालुक्यातील १०१९ विद्यार्थिनीना मिळाला आहे. नगरपरिषदेच्या शाळांमधील ६७ विद्यार्थिनींनाही याचा लाभ मिळाला. आहे. या योजनेसाठी १८ लाख ७९ हजार ५०० इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)तालुकासंख्यारक्कममंडणगड३७७१,१३,१००दापोली७६०२,२८,०००खेड१०१९३,०५,७००चिपळूण७१०२,१३,०००गुहागर४५३१,३५,९००संगमेश्वर९४०२,८२,०००रत्नागिरी८३९२,५१,७००लांजा३९०१,१७,०००राजापूूर७१०२,१३,०००नगरपरिषद६७२०,१००एकूण६२६५१८,७९,५००शासनाने १९८३ - ८४मध्ये सुरु केली ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना’.आर्थिक सहाय्याचा हात पुढे करणाऱ्या समाजातील अनेक व्यक्तींमुळे गरजू मुलींना शिक्षण सोपे.पालिकेच्या शाळांमध्येही मिळाला लाभ.