शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बांगलादेशीला रत्नागिरीत जन्म दाखला; मुंबई पोलिसांकडून तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:50 IST

रत्नागिरी : शहरालगतच्या एका श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीतून बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई ...

रत्नागिरी : शहरालगतच्या एका श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीतून बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई येथे बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांवरून ही बाब समोर आली. दरम्यान, याप्रकरणी जन्म दाखला देणाऱ्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांना मुंबई पाेलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.मोहम्मद इद्रीस इसाक शेख असे मुंबई पोलिसांकडून अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. मुंबई पोलिसांकडून शेख याला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याजवळ रत्नागिरीतील एका ग्रामपंचायतीतून जन्म दाखला दिल्याचे आढळले. त्याच्या जन्म दाखल्यावर जन्म १ मे १९८३ रोजी असा उल्लेख असून, उद्यमनगर पडवेकर कॉलनी, ता. जि. रत्नागिरी असा पत्ता आहे. तसेच आईचे नाव शाहिदा बेगम मोहम्मद इसाक शेख व वडिलांचे नाव मोहम्मद इसाक शेख असे टाकण्यात आले आहे.पोलिसांच्या तपासामध्ये शेख याने खोटा जन्म दाखला तयार केल्याचे आढळले आहे. हा दाखल रत्नागिरीनजीकच्या श्रीमंत समजल्या जाणाऱ्या एका ग्रामपंचायतीतून देण्यात आल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पाेलिसांचा तपास रत्नागिरीपर्यंत येऊन पाेहाेचला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत जन्म दाखला देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाला चाैकशीसाठी मुंबईत बाेलावले आहे. त्याबाबतचे पत्र रत्नागिरीत दाखल हाेताच एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस