शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

बाबासाहेबांच्या जयंती, महापरिनिर्वाण दिनीच येते फक्त त्यांच्या मूळगावाची आठवण, मात्र नंतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 3:24 PM

महापरिनिर्वाण दिन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आली की, साऱ्यांनाच बाबासाहेबांचे मूळगाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड) गावाची आठवण हाेते. मात्र, या गावाच्या विकासासंदर्भात राज्यकर्त्यांची भूमिका वेळाेवेळी बदलत गेली आहे

प्रशांत सुर्वेमंडणगड : महापरिनिर्वाण दिन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आली की, साऱ्यांनाच बाबासाहेबांचे मूळगाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड) गावाची आठवण हाेते. मात्र, या गावाच्या विकासासंदर्भात राज्यकर्त्यांची भूमिका वेळाेवेळी बदलत गेली आहे. गेल्या ६५ वर्षांच्या अनास्थेची पुनरावृत्ती गेल्या पाच वर्षांत झाली आहे. राज्यकर्ता बदलले तरी आम्ही आहाेत तेथेच आहाेत, अशी भावना आता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन व आंबेडकर जयंती वेळी जगभरातून अनुयायी तसेच त्यांच्या विचारांना मानणारे लोक अभिवादन करण्यासाठी आंबडवे याठिकाणी येतात. महामानवाचे गाव असूनही हे गाव आजही अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहिले आहे. आंबडवे गावाला शासकीय, निमशासकीय, तसेच विविध संस्थांचे मोठमोठे पदाधिकारी भेट देतात. डाॅ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काहीतरी करावे या उद्देशाने माघारी फिरतात. मात्र, आजवर केवळ आश्वासनांपलीकडे काहीच झालेले नाही.

केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यु.जी.सी. ग्रांट कमिशनच्या माध्यमातून देशातील मागास भागात उच्च व तंत्र शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने मॉडेल कॉलेजची निर्मिती झाली. २०१३ मध्ये महाविद्यालयाचे कामकाजास सुरू झाले. मात्र, गेल्या आठ वर्षांत या महाविद्यालयात इंटरनेटची सुविधा उपलब्ध हाेऊ शकलेली नाही. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून केवळ बीबीएम व बीएससी (आय.टी.) हे दोनच शिक्षणक्रम महाविद्यालयात शिकविले जातात. महाविद्यालयाची इमारत अद्यापही बांधलेली नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या खोलीमध्ये सध्या महाविद्यालयाचे नैमित्तिक कामकाज सुरू आहे. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह नाही. महाविद्यालय सुरू झाले असले तरी अपुऱ्या सोयीसुविधांमुळे या ठिकाणी अन्य तालुक्यांतून विद्यार्थी दाखल हाेत नाहीत.

रस्ते, वीज, औषधोपचार, बँक सुविधा, जेवण व्यवस्था, इंटरनेट यासारख्या अडचणी आजही या गावात कायम आहेत. आंबडवेच्या विकास आराखड्यात लोणंद ते आंबडवे हा राष्ट्रीय महामार्ग असून, याकरिता सुमारे ३५० कोटी रुपयांचे काम प्रस्तावित केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाड-राजेवाडी रस्त्यांच्या कामाच्या प्रारंभाचे श्रीफळ वाढविले. मात्र, तीन वर्षांनंतरही कामाला सुरुवात झालेली नाही.

संसद ग्राम याेजना फसली

खासदार अमर साबळे यांनी विकासाच्या दृष्टीने आंबडवे गाव दत्तक घेतले होते. शासनाच्या विविध विभागांच्या सहभागाने कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. मात्र, गेल्या चार वर्षांत आराखड्यातील कोणतेही ठळक विकासकाम खासदारांना साधता आलेले नाही. त्यामुळे ही याेजना पुरती फसली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर