शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Baba Ramdev: CM उद्धव ठाकरेंचं काम चांगलं, ED धाडसत्रावरही रामदेव बाबांनी मौन सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 22:44 IST

११ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रत्नागिरीकरांना रामदेव बाबा यांच्या सानिध्यात योग करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

मुंबई -जागतिक महिला दिनानिमित्त 9 मार्च रोजी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे पहाटे 5 वाजता प्रात:कालीन योग शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी योगगुरू बाबा रामदेव हे रत्नागिरीत आले आहेत. यावेळी, पत्रकारानी त्यांना घेरले असता, विविध मुद्द्यांवर त्यांनी आपलं मत मांडलं. यावेळी, महाराष्ट्र राज्यात ईडीचं सुरू असलेलं धाडसत्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काम यावरही त्यांनी बिनधास्तपणे भाष्य केलं. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काम चांगलं असल्याचं ते म्हणाले. 

११ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रत्नागिरीकरांना रामदेव बाबा यांच्या सानिध्यात योग करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. रत्नागिरी शहराच्या आसपासच्या २० किलोमीटर परिसरातून येणाऱ्यांसाठी पतंजलीतर्फे मोफत एसटी सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. रामदेव बाबा या योग शिबिरासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी ऐतिहासिक पतितपावन मंदिर याच ठिकाणच्या वीर सावरकर स्मारक आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला भेट दिली. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळेल असं एक्झीट पोलमधून दिसतंय, काही लोकांना वाटलं होतं 5 राज्यांमध्ये बीजेपी रसातळाला जाईल पण तसं होत नाही, असे रामदेव यांनी म्हटले.  

काँग्रेसला नेतृत्व बदलाची गरज

सोशल मिडियावर तसं चित्र दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, तसं होणार नाही. भाजपसोबत केजरीवालसुद्धा चांगली कामगिरी करेल. काँग्रेसला राज्य स्तरावर नेतृत्वाचा अभाव आहे राष्ट्रीय स्तरावर आणखी नेतृत्वात ओजस्वीत मिळाली तर काँग्रेस अधिक बळकट होईल, असे म्हणत काँग्रेस पक्षात बदलाची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सध्याची निवडणूक सर्वांना आत्मपरिक्षण करण्याची संधी मिळेल. बाकी, माझ्यासारखा फकीर यावर काय बोलणार असे म्हणत पाच राज्यांच्या निकालावर अधिक बोलणं रामदेव बाबांनी टाळलं. 

उद्धव ठाकरेंचं काम चांगलं

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगल काम करत असल्याची कौतुकाची थाप रामदेव यांनी दिली. दरम्यानं महाराष्ट्रात सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या धाड सत्रावर बोलताना दोन वजीर लढत आहेत, असं विधान त्यांनी केलं. मुख्य गोष्ट म्हणजे वीर सावरकर हे भारतरत्न असून त्यांना भारतरत्न मिळायला हवा. आज ना उद्या याची घोषणा नक्की होईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMumbaiमुंबईEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय