शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ratnagiri: पाणी उशिरा दिल्याच्या रागातून कार थेट हॉटेलमध्येच नेण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 12:02 IST

कारचालकाची जमावाकडून धुलाई

चिपळूण (जि. रत्नागिरी) : पाणी उशिरा दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ग्राहकाने चक्क हॉटेलमध्येच कार नेण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार चिपळूण शहरातील काविळतळी येथे शनिवारी रात्री घडला. हाॅटेलसमोर दुचाकी असल्याने त्याचा हा प्रयत्न फसला. मात्र, यामध्ये सुरक्षारक्षक जखमी झाला असून, चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आशीर्वाद विजय आयरे (४८, रा. खेर्डी, मूळ गाव खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.काविळतळी परिसरात प्रवीण शिंदे यांचे ओमीज किचन नावाचे हॉटेल आहे. गर्दीमुळे अनेकजण हॉटेलच्या बाहेर प्रतीक्षेत होते. अशा परिस्थितीत आशीर्वाद आयरे हे हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र, ग्राहकांची गर्दी असल्याने पाणी देण्यास उशीर झाला. त्यामुळे आयरे यांनी हॉटेलमालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली.त्यानंतर रागाच्या भरात आयरे तेथून निघून गेले. रस्त्यावर उभी केलेली आपली कार त्यांनी भरधाव वेगाने थेट हॉटेलमध्ये घुसविण्याचा व येथील लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे एकच धावपळ उडाली. हॉटेलच्या बाहेर काही दुचाकी उभ्या असल्याने कार थेट हाॅटेलमध्ये गेली नाही. मात्र, या घटनेत हॉटेलच्या बाहेर उभा असलेले सुरक्षारक्षक अनिल सुर्वे जखमी झाले आहेत.

जमावाकडून धुलाईया घटनेनंतर हाॅटेल आणि हाॅटेलच्या बाहेर एकच गाेंधळ उडाला हाेता. जमावाने आशीर्वाद आयरे यांना घटनेबाबत जाब विचारला. मात्र, त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त जमावाने त्यांची धुलाई केली. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस