शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

जलयुक्त शिवार योजनेचा चौथा आराखडा जाहीर,  दोन टप्पे पूर्ण, तिसऱ्या टप्प्याची कामे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 15:58 IST

भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यात सन २०१५ - १६पासून ह्यजलयुक्त शिवार योजनाह्ण एकाचवेळी सुरू करण्यात आली. या योजनेतील पहिल्या दोन टप्प्यांतील कामांची पूर्तता झाली असून, तिसऱ्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. योजनेचा चौथ्या टप्पा सन २०१८-१९मध्ये राबविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील २३ गावांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजनेचा चौथा आराखडा जाहीर दोन टप्पे पूर्ण, तिसऱ्या टप्प्याची कामे सुरु

रत्नागिरी : भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यात सन २०१५ - १६पासून जलयुक्त शिवार योजना एकाचवेळी सुरू करण्यात आली. या योजनेतील पहिल्या दोन टप्प्यांतील कामांची पूर्तता झाली असून, तिसऱ्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. योजनेचा चौथ्या टप्पा सन २०१८-१९मध्ये राबविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील २३ गावांची निवड करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७३७ कामांची पूर्तता करण्यात येणार असून, त्यासाठी १७ कोटी १७ लाख ६ हजार रूपयांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामांना प्रारंभ होणार आहे.या योजनेतील चौथ्या टप्प्यांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली, मालगुंड, निवेंडी, लांजा तालुक्यातील कोंडगे, कोंडगाव, वाकेड, राजापूर तालुक्यातील होळी, मंदरूळ, धामणवणे, भोम, चिपळूण तालुक्यातील गोंधळे (माजरेकोंड), पोसरे, टेरव, मासरंग, निवदे, निवे (बु), संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे, विघ्रवली, माभळे, भडकंबा, गुहागर तालुक्यातील चिखली, उमराट, दापोली तालुक्यातील हर्णै, कवडोळी, गावराई, पोफळवणे या गावांची निवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील चिंचवळी, किंजळेतर्फ नातू, वाडीजैतापूर, सवेणी, मंडणगड तालुक्यातील अडखळवण, घोसाळे या गावांची निवड करण्यात आली आहे.जलयुक्त शिवारच्या जिल्ह्यातील कामांची पूर्तता करण्यासाठी कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद कृषी विभाग, जलसंधारण या विभागांकडे जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे. कृषी विभागाकडे ४९३ कामांसाठी ३ कोटी ७६ लाख ६३ हजारांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.

सामाजिक वनीकरण विभागाकडे अवघे एक काम असून, त्यासाठी एक लाख २१ हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे १७० कामांची जबाबदारी असून, त्यासाठी एक कोटी ८६ लाख ६० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडील ६१ कामांसाठी ३८ लाख ६० हजार रूपये निधीची आवश्यकता आहे. जलसंधारण विभागाकडे १२ कामांची जबाबदारी असून, त्यासाठी २ कोटी १४ लाख २ हजार रूपयांची निधी अपेक्षित आहे.विविध तालुक्यांसाठी आवश्यक निधीरत्नागिरी तालुक्यातील ११९ कामांसाठी १ कोटी २ लाख ३३ हजार रूपये निधी आवश्यक आहे. लांजा तालुक्यात ४६ कामे निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी २ कोटी २६ लाख ३८ हजारांचा निधी लागणार आहे. राजापूर तालुक्यात ३९ कामांचे नियोजन करण्यात आले असून, त्याकरिता एक कोटी ७ लाख ४४ हजारांचा निधी लागणार आहे.

गुहागरात ७४ कामे करण्यात येणार असून, त्यासाठी एक कोटी ६२ लाख ९९ हजार, संगमेश्वरातील ७५ कामांसाठी १ कोटी ८ लाख ५९ हजार रूपयांचा निधी आवश्यक आहे. खेड तालुक्याला १२३ कामांचे उद्दिष्ट असून, ३ कोटी १५ लाख ३८ हजार रुपये, दापोलीतील ११४ कामांसाठी ३ कोटी ९७ लाख ८८ हजार, मंडणगडातील ५१ कामांंसाठी एक कोटी ९ लाख ३० हजारांचा निधी अपेक्षित आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारRatnagiriरत्नागिरी