शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

जलयुक्त शिवार योजनेचा चौथा आराखडा जाहीर,  दोन टप्पे पूर्ण, तिसऱ्या टप्प्याची कामे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 15:58 IST

भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यात सन २०१५ - १६पासून ह्यजलयुक्त शिवार योजनाह्ण एकाचवेळी सुरू करण्यात आली. या योजनेतील पहिल्या दोन टप्प्यांतील कामांची पूर्तता झाली असून, तिसऱ्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. योजनेचा चौथ्या टप्पा सन २०१८-१९मध्ये राबविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील २३ गावांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजनेचा चौथा आराखडा जाहीर दोन टप्पे पूर्ण, तिसऱ्या टप्प्याची कामे सुरु

रत्नागिरी : भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यात सन २०१५ - १६पासून जलयुक्त शिवार योजना एकाचवेळी सुरू करण्यात आली. या योजनेतील पहिल्या दोन टप्प्यांतील कामांची पूर्तता झाली असून, तिसऱ्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. योजनेचा चौथ्या टप्पा सन २०१८-१९मध्ये राबविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील २३ गावांची निवड करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७३७ कामांची पूर्तता करण्यात येणार असून, त्यासाठी १७ कोटी १७ लाख ६ हजार रूपयांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामांना प्रारंभ होणार आहे.या योजनेतील चौथ्या टप्प्यांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली, मालगुंड, निवेंडी, लांजा तालुक्यातील कोंडगे, कोंडगाव, वाकेड, राजापूर तालुक्यातील होळी, मंदरूळ, धामणवणे, भोम, चिपळूण तालुक्यातील गोंधळे (माजरेकोंड), पोसरे, टेरव, मासरंग, निवदे, निवे (बु), संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे, विघ्रवली, माभळे, भडकंबा, गुहागर तालुक्यातील चिखली, उमराट, दापोली तालुक्यातील हर्णै, कवडोळी, गावराई, पोफळवणे या गावांची निवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील चिंचवळी, किंजळेतर्फ नातू, वाडीजैतापूर, सवेणी, मंडणगड तालुक्यातील अडखळवण, घोसाळे या गावांची निवड करण्यात आली आहे.जलयुक्त शिवारच्या जिल्ह्यातील कामांची पूर्तता करण्यासाठी कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद कृषी विभाग, जलसंधारण या विभागांकडे जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे. कृषी विभागाकडे ४९३ कामांसाठी ३ कोटी ७६ लाख ६३ हजारांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.

सामाजिक वनीकरण विभागाकडे अवघे एक काम असून, त्यासाठी एक लाख २१ हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे १७० कामांची जबाबदारी असून, त्यासाठी एक कोटी ८६ लाख ६० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडील ६१ कामांसाठी ३८ लाख ६० हजार रूपये निधीची आवश्यकता आहे. जलसंधारण विभागाकडे १२ कामांची जबाबदारी असून, त्यासाठी २ कोटी १४ लाख २ हजार रूपयांची निधी अपेक्षित आहे.विविध तालुक्यांसाठी आवश्यक निधीरत्नागिरी तालुक्यातील ११९ कामांसाठी १ कोटी २ लाख ३३ हजार रूपये निधी आवश्यक आहे. लांजा तालुक्यात ४६ कामे निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी २ कोटी २६ लाख ३८ हजारांचा निधी लागणार आहे. राजापूर तालुक्यात ३९ कामांचे नियोजन करण्यात आले असून, त्याकरिता एक कोटी ७ लाख ४४ हजारांचा निधी लागणार आहे.

गुहागरात ७४ कामे करण्यात येणार असून, त्यासाठी एक कोटी ६२ लाख ९९ हजार, संगमेश्वरातील ७५ कामांसाठी १ कोटी ८ लाख ५९ हजार रूपयांचा निधी आवश्यक आहे. खेड तालुक्याला १२३ कामांचे उद्दिष्ट असून, ३ कोटी १५ लाख ३८ हजार रुपये, दापोलीतील ११४ कामांसाठी ३ कोटी ९७ लाख ८८ हजार, मंडणगडातील ५१ कामांंसाठी एक कोटी ९ लाख ३० हजारांचा निधी अपेक्षित आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारRatnagiriरत्नागिरी