शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वित्त आयोगाच्या व्याजावरही डल्ला, विकासाला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 3:37 PM

चौदाव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीवरील व्याज आणि तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी शासनाने जमा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे सुमारे एक कोटी रुपये परत करावे लागणार आहेत़ गावच्या विकासाचा निधी परत जाणार असतानाच व्याजाची रक्कमही शासनाने परत घेतल्याने ग्रामपंचायतींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़.

ठळक मुद्देवित्त आयोगाच्या व्याजावरही डल्ला, विकासाला खीळचौदाव्या वित्त आयोगाचा निधीही परत मागितला

रत्नागिरी : चौदाव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीवरील व्याज आणि तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी शासनाने जमा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे सुमारे एक कोटी रुपये परत करावे लागणार आहेत़ गावच्या विकासाचा निधी परत जाणार असतानाच व्याजाची रक्कमही शासनाने परत घेतल्याने ग्रामपंचायतींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़.कोरोनामुळे शासनाच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे़ त्यामुळे शासन आर्थिक अडचणीत सापडले असल्याने तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावचा विकास करण्यासाठी तेराव्या व चौदाव्या वित्त आयोगातून शासनाकडून निधी दिला जातो़ त्यासाठी प्रत्येक गावचा आराखडा तयार करून तो जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला सादर करण्यात येतो़शासनाने यावर्षी गावागावात कोरोना प्रतिबंधासाठी होमिओपॅथिक औषधे वाटण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींना आदेश काढले आहेत़ या औषधांच्या खरेदीसाठी ग्रामपंचायतस्तरावर शिल्लक असलेला तेराव्या वित्त आयोगातील अखर्चित निधी आणि चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचे व्याज सरकारने जमा करण्याचे आदेश दिले होते़ हा निधी शासनाच्या खात्यावर ग्रामपंचायतींना जमा करावा लागणार आहे़या आदेशाबाबतची सूचना पंचायत समिती गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे. आर्थिक दृष्ट्या आधीच गरीब असलेल्या ग्रामपंचायतींकडे निधी परत मागण्यात आल्याने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून होणारा गावचा विकास रखडणार आहे़ त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे़

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी