शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

आशापुरा मायनिंग कंपनीच्या सुनावणीत ग्रामस्थ आक्रमक,  कंपनीला विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 3:41 PM

दापोली तालुक्यातील आशापुरा मायनिंग कंपनीच्या शुक्रवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये उंबरशेत, रोवले येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीला विरोध कायम ठेवला. या कंपनीमुळे आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच हाणून पाडली.

ठळक मुद्देआशापुरा मायनिंग कंपनीच्या सुनावणीत ग्रामस्थ आक्रमक,  कंपनीला विरोध कायम आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याने विरोध

दापोली : तालुक्यातील आशापुरा मायनिंग कंपनीच्या शुक्रवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये उंबरशेत, रोवले येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीला विरोध कायम ठेवला. या कंपनीमुळे आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच हाणून पाडली.महाराष्ट्र शासन, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय यांच्या आदेशानुसार उंबरशेत, उटंबर खाणपट्ट्यातील खनिकर्मच्या उत्खननाबाबत दापोलीतील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.दापोली तालुक्यातील केळशी पंचक्रोशीतील जनतेच्या हरकती असल्यास जनसुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहून हरकती नोंदविता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. काही लोकांच्या विरोधामुळे आशापुरा मायनिंग गेले वर्षभर बंद आहे. मायनिंगच्या उत्खननाला काही लोकांचा विरोध असल्याने आशापुरा मायनिंग कंपनी बंद आहे. त्यामुळे या जनसुनावणीत ग्रामस्थांची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागले होते.जनसुनावणीसाठी केळशी परिसरातील ग्रामस्थ सकाळपासूनच शासकीय विश्रामगृहाबाहेर जमले होते. जनसुनावली सुरूवात होताच ग्रामस्थांनी कंपनी विरोधी भूमिका घेण्यास सुरूवात केली. खाणपट्ट्यात सुरू असलेल्या मायनिंगमुळे या भागातील आंबा, काजूच्या बागा नष्ट होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी कंपनीला आपला विरोध कायम ठेवला.

या सुनावणीवेळी ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच उधळून लावल्याने अधिकाऱ्यांनीही ही सुनावणी थांबवली. ग्रामस्थांच्या या विरोधी भूमिकेमुळे आशापुरा मायनिंग कंपनीचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी