शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर सेनेचा भगवा : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:01 IST

रत्नागिरी शहरात भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले ठरणारे थ्रीडी तारांगण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारले जाणार आहे. तारांगणाचे भूमिपूजन या ठिकाणी झाले असून त्याचे उदघाटनही येत्या दीड वर्षात होईल. कामाचा असाच धडाका शिवसैनिकांनी सुरू ठेवावा, म्हणजे येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देयेत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर सेनेचा भगवा : आदित्य ठाकरेमहाराष्ट्रातील पहिल्या थ्रीडी तारांगणाचे रत्नागिरीत भूमिपूजनठाकरे अ‍ॅक्टीव्हिटी सेंटरचे उदघाटन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले ठरणारे थ्रीडी तारांगण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारले जाणार आहे. तारांगणाचे भूमिपूजन या ठिकाणी झाले असून त्याचे उदघाटनही येत्या दीड वर्षात होईल. कामाचा असाच धडाका शिवसैनिकांनी सुरू ठेवावा, म्हणजे येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला.शहरातील माळनाका येथे हे तारांगण १२०० चौरस मीटर क्षेत्रात उभारले जात असून त्यासाठी ५ कोटी ६८ लाख रुपये निधीला पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मंजूरी घेतली आहे. साळवी स्टॉप येथील बाळासाहेब ठाकरे अ‍ॅक्टीव्हीटी सेंटरचे उद्घाटन व नंतर तारांगणाचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.तारांगणाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यासपीठावर ठाकरे यांच्यासोबत पालकमंत्री रवींद्र वायकर, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, सेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, नगराध्यक्ष राहुल पंडित, उपनगराध्यक्ष स्मितल पावसकर, सेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी उपस्थित होते.यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही केवळ निवडणुकीपुरती नाही तर निवडणुकीत दिलेल्या वचनांना जागणारी आहे, हे वारंवार शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. विकासकामांचे भूमिपूजन झाल्यानंतर त्याचे निर्धारित वेळेत उद्घाटनही होते हेच रत्नागिरीतील अ‍ॅक्टीव्हीटी सेंटरच्या उदघाटनामुळे सिध्द झाले आहे. तारांगणाप्रमाणेच रत्नागिरीत आणखी वेगळा असा ह्यआपले अंगणह्ण प्रकल्प वास्तूरुपाने उभारण्यात यावा. त्यामध्ये सर्व प्रकारच्या तज्ञांना एकत्र येता यावे, नवीन आयडियांचे आदान प्रदान करून त्यातून नवीन प्रकल्प साकार व्हावेत, असेही ठाकरे म्हणाले.आमदार उदय सामंत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे तारांगणासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी एका टप्प्यात ५ कोटी ६८ लाख निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खासदार विनायक राऊत म्हणाले की, शिवसेना केवळ आश्वासने देऊन थांबत नाही तर त्यांची पुर्तता करते, हे रत्नागिरीतील कामांवरून स्पष्ट झाले आहे. तारांगणासाठी निधीची तरतूद केल्याबद्दल राऊत यांनी पालकमंत्री वायकर यांना धन्यवाद दिले.रत्नागिरीत शिवसेनाप्रमुखांच्या नावे तारांगण उभे राहणे हे कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी भुषणावह आहे. १२०० चौरस मीटर क्षेत्रात होणाऱ्या या तारांगणासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित व आमदार उदय सामंत यांनी जो पाठपुरावा केला त्याबाबत वायकर यांनी त्यांचे कौतुक केले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अभिजीत गोडबोले यांनी केले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेRatnagiriरत्नागिरी