शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर सेनेचा भगवा : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:01 IST

रत्नागिरी शहरात भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले ठरणारे थ्रीडी तारांगण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारले जाणार आहे. तारांगणाचे भूमिपूजन या ठिकाणी झाले असून त्याचे उदघाटनही येत्या दीड वर्षात होईल. कामाचा असाच धडाका शिवसैनिकांनी सुरू ठेवावा, म्हणजे येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देयेत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर सेनेचा भगवा : आदित्य ठाकरेमहाराष्ट्रातील पहिल्या थ्रीडी तारांगणाचे रत्नागिरीत भूमिपूजनठाकरे अ‍ॅक्टीव्हिटी सेंटरचे उदघाटन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले ठरणारे थ्रीडी तारांगण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारले जाणार आहे. तारांगणाचे भूमिपूजन या ठिकाणी झाले असून त्याचे उदघाटनही येत्या दीड वर्षात होईल. कामाचा असाच धडाका शिवसैनिकांनी सुरू ठेवावा, म्हणजे येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला.शहरातील माळनाका येथे हे तारांगण १२०० चौरस मीटर क्षेत्रात उभारले जात असून त्यासाठी ५ कोटी ६८ लाख रुपये निधीला पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मंजूरी घेतली आहे. साळवी स्टॉप येथील बाळासाहेब ठाकरे अ‍ॅक्टीव्हीटी सेंटरचे उद्घाटन व नंतर तारांगणाचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.तारांगणाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यासपीठावर ठाकरे यांच्यासोबत पालकमंत्री रवींद्र वायकर, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, सेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, नगराध्यक्ष राहुल पंडित, उपनगराध्यक्ष स्मितल पावसकर, सेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी उपस्थित होते.यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही केवळ निवडणुकीपुरती नाही तर निवडणुकीत दिलेल्या वचनांना जागणारी आहे, हे वारंवार शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. विकासकामांचे भूमिपूजन झाल्यानंतर त्याचे निर्धारित वेळेत उद्घाटनही होते हेच रत्नागिरीतील अ‍ॅक्टीव्हीटी सेंटरच्या उदघाटनामुळे सिध्द झाले आहे. तारांगणाप्रमाणेच रत्नागिरीत आणखी वेगळा असा ह्यआपले अंगणह्ण प्रकल्प वास्तूरुपाने उभारण्यात यावा. त्यामध्ये सर्व प्रकारच्या तज्ञांना एकत्र येता यावे, नवीन आयडियांचे आदान प्रदान करून त्यातून नवीन प्रकल्प साकार व्हावेत, असेही ठाकरे म्हणाले.आमदार उदय सामंत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे तारांगणासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी एका टप्प्यात ५ कोटी ६८ लाख निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खासदार विनायक राऊत म्हणाले की, शिवसेना केवळ आश्वासने देऊन थांबत नाही तर त्यांची पुर्तता करते, हे रत्नागिरीतील कामांवरून स्पष्ट झाले आहे. तारांगणासाठी निधीची तरतूद केल्याबद्दल राऊत यांनी पालकमंत्री वायकर यांना धन्यवाद दिले.रत्नागिरीत शिवसेनाप्रमुखांच्या नावे तारांगण उभे राहणे हे कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी भुषणावह आहे. १२०० चौरस मीटर क्षेत्रात होणाऱ्या या तारांगणासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित व आमदार उदय सामंत यांनी जो पाठपुरावा केला त्याबाबत वायकर यांनी त्यांचे कौतुक केले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अभिजीत गोडबोले यांनी केले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेRatnagiriरत्नागिरी