शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

राज्यातील धरण दुरुस्तीसाठी पुरेसा निधी : जयंत पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 18:19 IST

chilplun, ncp, jayantpatil, dam, ratnagirinews तिवरे धरणफुटीची घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येताच यावर गांभीर्याने विचार करण्यात आला. राज्यातील ज्या-ज्या धरणांना गळतीचे प्रमाण अधिक आहे, अशाठिकाणी दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी निधीही पुरेसा उपलब्ध असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्दे धरणांचे ऑडिट होणार, तिवरे धरणफुटी आणि दुरूस्तीच्या प्रश्नाची घेतली गंभीर दखलपुनर्बांधणीसाठी पुरेसा निधी देण्याची मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही

चिपळूण : तिवरे धरणफुटीची घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येताच यावर गांभीर्याने विचार करण्यात आला. राज्यातील ज्या-ज्या धरणांना गळतीचे प्रमाण अधिक आहे, अशाठिकाणी दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी निधीही पुरेसा उपलब्ध असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे सांगितले.उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड व गुहागर तालुक्यातील कार्यकर्ता संवाद कार्यक्रम सावर्डे येथे आयोजित केला होता. यानिमित्ताने जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पाटील यांनी माजी आमदार कै. निशिकांत ऊर्फ नाना जोशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, तिवरे धरणफुटीचा चौकशी अहवाल जलसंधारण खात्याच्या अखत्यारित येतो. मात्र, या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी पुरेसा निधी उपलब्ध केला जाईल. एवढेच नव्हे तर या घटनेनंतर राज्यात सर्वच धरणांचे ऑडिट केले जात आहे. त्यामध्ये अति गळती आढळल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना केली जात आहे.अर्णव गोस्वामी प्रकरणी ते म्हणाले की, त्याचा सरकारच्या इमेजवर कोणताही परिणाम होणार नाही किंवा त्याचा सरकारशी काहीही संबंध नाही. पीडित कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण पुढे आल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, शुभदा जोशी, शौकत मुकादम, बाबाजी जाधव उपस्थित होते.भाजपला टोलाअर्णब गोस्वामी प्रकरणात दोघांनी आत्महत्या केली असून, अशा विषयात त्या पीडित कुटुंबियांवर अन्याय व्हावा, असे कोणालाही अपेक्षित नाही. पण भाजपने हे प्रकरण समोर ठेवून आवाज उठवला तर त्यात काही विशेष नाही. कारण भाजपने तळागाळातील लोकांसाठी कधीही आवाज उठवलेला नाही, अशा मोजक्या शब्दात जयंत पाटील यांनी भाजपला टोला मारला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलDamधरणRatnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसChiplunचिपळुण