शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

साई रिसॉर्ट प्रकरणातील अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, किरीट सोमय्यांची मागणी

By मनोज मुळ्ये | Updated: November 12, 2022 11:28 IST

प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यावरील आरोपांवरुन सोमय्या यांचे घूमजाव

रत्नागिरी : बेकायदेशीर साई रिसॉर्ट उभारण्यात ज्या अधिकाऱ्यांचा हात आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपली आग्रही मागणी आहे. बेकायदेशीर प्रकरणातील एकालाही मोकळीक देणार नसल्याचे भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.रत्नागिरीतील भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी पालकमंत्री व आमदार ॲड. अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी आपला जबाब नोंदवला आहे. ६२ पानांचे पुरावे आपण पुन्हा पोलिसांना सादर केले आहेत. तसेच साई रिसॉर्ट तोडण्याची प्रक्रिया जोरात सुरु असून, ज्या दिवशी हे रिसॉर्ट तोडले जाईल त्यावेळी आपण स्वतः दापोलीत त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री असताना ॲड. परब यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन बेकायदेशीर रिसॉर्टची उभारणी केली. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर सदानंद कदम यांना विक्री केल्याचे दाखवण्यात आले असून या प्रकरणातील खरेदी-विक्री केल्याचा तपशिल ॲड. परब यांनी का लपवला, असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला.आव्हाडांवरील कारवाईचे समर्थन'हर हर महादेव' चित्रपटाला जोरदार विरोध करीत चित्रपटगृहात प्रेक्षकांना दमदाटी करत धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईचे किरीट सोमय्या यांनी करून ही कारवाई योग्य. असल्याचे सांगितले. शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले असून, ते चुकीचे काम करणार नसल्याचा विश्वास व्यक्त

सरकार गेल्याचे आव्हाड विसरलेजितेंद्र आव्हाड ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना कधीही, कोणाच्याही घरात घुसून शिवीगाळ, मारहाण करत असत आणि ठाकरे सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांचेच संरक्षण करत असे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. आता ते सरकार गेल्याचे आव्हाड विसरल्याची टीकाही त्यांनी केली.

सोमय्या यांचे घूमजावप्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सोमय्या यांनी केले होते. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आता विरोधकांनी पुढे यावे, असे सांगून घूमजाव केले. एकप्रकारे त्यांनी आरोप केलेल्यांना 'क्लिनचीट' दिली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKirit Somaiyaकिरीट सोमय्या