शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

साई रिसॉर्ट प्रकरणातील अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, किरीट सोमय्यांची मागणी

By मनोज मुळ्ये | Updated: November 12, 2022 11:28 IST

प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यावरील आरोपांवरुन सोमय्या यांचे घूमजाव

रत्नागिरी : बेकायदेशीर साई रिसॉर्ट उभारण्यात ज्या अधिकाऱ्यांचा हात आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपली आग्रही मागणी आहे. बेकायदेशीर प्रकरणातील एकालाही मोकळीक देणार नसल्याचे भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.रत्नागिरीतील भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी पालकमंत्री व आमदार ॲड. अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी आपला जबाब नोंदवला आहे. ६२ पानांचे पुरावे आपण पुन्हा पोलिसांना सादर केले आहेत. तसेच साई रिसॉर्ट तोडण्याची प्रक्रिया जोरात सुरु असून, ज्या दिवशी हे रिसॉर्ट तोडले जाईल त्यावेळी आपण स्वतः दापोलीत त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री असताना ॲड. परब यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन बेकायदेशीर रिसॉर्टची उभारणी केली. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर सदानंद कदम यांना विक्री केल्याचे दाखवण्यात आले असून या प्रकरणातील खरेदी-विक्री केल्याचा तपशिल ॲड. परब यांनी का लपवला, असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला.आव्हाडांवरील कारवाईचे समर्थन'हर हर महादेव' चित्रपटाला जोरदार विरोध करीत चित्रपटगृहात प्रेक्षकांना दमदाटी करत धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईचे किरीट सोमय्या यांनी करून ही कारवाई योग्य. असल्याचे सांगितले. शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले असून, ते चुकीचे काम करणार नसल्याचा विश्वास व्यक्त

सरकार गेल्याचे आव्हाड विसरलेजितेंद्र आव्हाड ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना कधीही, कोणाच्याही घरात घुसून शिवीगाळ, मारहाण करत असत आणि ठाकरे सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांचेच संरक्षण करत असे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. आता ते सरकार गेल्याचे आव्हाड विसरल्याची टीकाही त्यांनी केली.

सोमय्या यांचे घूमजावप्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सोमय्या यांनी केले होते. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आता विरोधकांनी पुढे यावे, असे सांगून घूमजाव केले. एकप्रकारे त्यांनी आरोप केलेल्यांना 'क्लिनचीट' दिली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKirit Somaiyaकिरीट सोमय्या