शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
3
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
4
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
5
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
6
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
7
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
8
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
9
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
10
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
11
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
12
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
13
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
14
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
15
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
20
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्यासह अन्य साहित्य घेऊन निघाले, आगीत जळून खाक झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:42 IST

साहित्याचे जळलेले अवशेष पाहून मात्र अनेकांच्या डाेळ्यांत अश्रू दाटले

हर्षल शिरोडकरखेड : गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्यासह अन्य साहित्य घेऊन मुंबईतून मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील काेकणवासीय खासगी आराम बसने निघाले हाेते. मात्र, काेकणच्या हद्दीत येण्यापूर्वीच कशेडी घाटात आराम बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. रविवारी सकाळी आग शांत झाल्यानंतर काहींनी आगीत काही साहित्य वाचले का, हे पाहण्याचा प्रयत्न केला. पण, काेणाच्याच हाती काही लागले नाही. साहित्याचे जळलेले अवशेष पाहून मात्र अनेकांच्या डाेळ्यांत अश्रू दाटले हाेते.कोकणात गणेशोत्सव म्हटलं की, मुंबईत नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले गणेशभक्त आपापल्या गावी मिळेल त्या वाहनाने उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात. मुंबईतून गावी येताना गणेशोत्सवात सजावट करण्यासाठी लागणारे साहित्य, नातलगांसाठी नवीन कपडे, प्रसाद, विजेची तोरणे यासह विविध साहित्य साेबत घेऊन येतात.कुटुंबासहित प्रवास करणाऱ्या या मुंबईकरांनी उत्सवामुळे मौल्यवान दागिने, रोख रक्कम व इतर वस्तूही सोबत घेतलेल्या असतात. मालवणकडे निघालेल्या मुंबईकरांनीही आपल्यासाेबत उत्सवासाठी माेठ्या प्रमाणात साहित्य घेतले हाेते. बसच्या मागील डिकीत प्रवाशांनी बॅगा ठेवलेल्या हाेत्या. मात्र, शनिवारी मध्यरात्री बसला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण साहित्य जळून गेले.रविवारी सकाळी ही आग शांत झाल्यानंतर काही प्रवाशांनी बसमध्ये आगीतून काही साहित्य वाचले आहे का, याचा शाेध घेतला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. जळलेल्या साहित्यांचे अवशेष पाहिल्यानंतर त्यांचे अश्रू दाटून आले आणि गहिवरलेल्या अवस्थेत ते खाली उतरले.

आनंदावर विरजणसिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः पाच दिवस गणेशाची आराधना करणाऱ्या कुटुंबात सर्वसाधारणपणे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने कुटुंबातील स्त्रिया विविध प्रकारचे दागदागिने परिधान करतात. मुंबईतून आपल्या गावी येणारे कुटुंब आपले वर्षानुवर्षे केलेल्या कष्टाने मिळवलेले मौल्यवान दागिने सोबत घेऊन येतात. मात्र, हे माैल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी